रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी ७ मे रोजी होणार मतदान

आचारसंहिता लागू ; निकाल ४ जूनला जाहीर होणार

कणकवली दि.१६ मार्च(भगवान लोके)
देशात लोकसभेच्या ५४३ जागांच्या निवडणुकीसाठी १९ एप्रिल,२६ एप्रिल , ७ मे,१३ मे , २० मे, २५ मे व १ जून या ७ टप्यात मतदान होणार तर महाराष्ट्रात ४८ मतदासंघात ७, मे, १३ मे , २० मे , २५ मे , १ जून या दिवशी ५ टप्प्यात मतदान होणार, संपूर्ण देशातील सर्व जागांवरचा निकाल ४ जूनला जाहीर होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची घोषणा केली. सार्वत्रिक लोकसभा निवडणूक -2024 साठी आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी ७ मे रोजी मतदान होणार आहे.

महाराष्ट्रात मतदान कधी आणि कुठे ?

◾️पहिला टप्पा – 19 एप्रिल – रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर

◾️दुसरा टप्पा 26 एप्रिल – बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी

◾️तिसरा टप्पा 7 मे – रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले

◾️चौथा टप्पा 13 मे – नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड

◾️पाचवा टप्पा 20 मे – धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ असे निवडणुकीसाठी मतदान होईल.