लोकसभा निवडणुकीसाठी सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघात भाजपचाच उमेदवार असावा – सौरभ ताम्हणकर

मालवण,दि .१९ मार्च

लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून भाजप -शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस महायुती तर्फे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी अद्यापही उमेदवार निश्चित झालेला नाही. मात्र या मतदार संघात भाजप नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून झालेली विकासकामे व भाजप पक्षाचे कार्य पाहता रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघांसाठी उमेदवार हा भाजप पक्षाचाच असावा, अशी इच्छा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजयुमो कार्यकर्त्यांची असल्याचे भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर यांनी प्रसिद्धीपत्रकार जिल्ह्यातील भाजयुमो कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचा इतिहास जर पहिला तर २०१४ व २०१९ सालीच्या निवडणुकीत शिवसेना व भाजपा पक्षाची युती असल्याने शिवसेना पक्षाचे उमेदवार विनायक राऊत हे युती मधून निवडून आले. परंतु युती बिघडली. परंतु आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात भाजप पक्ष कमळ चिन्हावर निवडणूक लढवून मोठ्या मताधिक्याने विजयी होऊ शकततो, असा विश्वास भाजयुमो कार्यकर्त्यांना आहे असे सौरभ ताम्हणकर यांनी म्हटले आहे.

गेले अडीज वर्ष सिंधुदुर्ग तसेच रत्नागिरी जिल्ह्याचा विकास हा प्रगतशील मार्गाने होत आहे. या ठिकाणी मोदी सरकारच्या योजनांचे लाभ सर्वसामय नागरिकांना पर्यंत पोहचवण्यात आले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावोगावी मोदी सरकारला पूर्ण पाठिंबा दिसून येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास हा भाजपच्या नेत्यांच्या माध्यमातून होत आहे. राज्यात जेव्हा भाजप पुन्हा सतेत आले, तेव्हा सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुंबई गोवा महामार्गाचे रखडलेले काम हाती घेत बऱ्यापैकी पूर्णत्वास आणले. त्याच प्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व रस्ते हे देखील योग्य दर्जाचे झाले आहे. त्याच प्रमाणे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे स्वप्न असलेल्या चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळावरून विमान फेऱ्या वाढत आहेत. मुंबई – गोवा महामार्गाच्या सुशोभीकारणा साठी ११ कोटीचा निधी केंद्रीय मंत्री ना. राणे यांच्या मांगणीनुसार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून प्राप्त झाला आहे.

जिल्ह्यातील पर्यटन, मत्स्य, शेती सारख्या विविध क्षेत्रात ना. राणे यांचे मोठे योगदान आहे. त्याचप्राणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारच्या निधीतून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते सिंधुदुर्गनगरी येथे १५५ कोटीच्या यांत्रिकी केंद्राचे भूमिपूजन संपन्न झाले, त्याच प्रमाणे मालवण – तारकर्ली मध्ये नौदल दिन साजरा होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. मालवण येथील राजकोट किल्ल्याचे पुनर्जीवीकरण करून तेथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले, असे ताम्हणकर यांनी म्हटले आहे.

दुसरीकडे माजी खासदार निलेश राणे हे पारंपरिक मच्छिमार व्यावसायिक, टॉलर व्यावसायिक तसेच पर्यटन व्यावसायिक यांच्या पाठीशी खंबीर उभे राहिले आहेत. निलेश राणेंच्या माध्यमातून दांडी येथे बंधारा कम जेटीच्या कामाला मंजुरी मिळाली. अंगणवाडी नूतनीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. चव्हाण यांच्या माध्यमातून निधी मंजूर करण्यात आले. तर कणकवली देवगड मतदार संघात आमदार नितेश राणे यांनीही विकासकामे केल्याने ते जनसामान्यांच्या गळ्यातले ताईत बनले आहेत असे सौरभ ताम्हणकर यांनी म्हटले आहे. त्यामुळे या सर्वांच्या विकासकामामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात भाजपचा उमेदवार असावा, अशी इच्छा सौरभ ताम्हणकर यांनी व्यक्त केली आहे.