सावंतवाडी,दि.२० मार्च
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी वर्ग सधन नसला तरी आपला आत्मसन्मान व स्वाभिमान टिकवून आहे. शेतकऱ्यांसाठी असलेल्या शासकीय योजना जो पर्यंत शेवटच्या घटकांपर्यंत पोहचत नाहीत तो पर्यंत आपला शेतकरी संपन्न होणार नाही. येथील शेतमालाला योग्य भाव मिळत नाही त्यासाठी स्थानीक पातळीवर शेतमाल खरेदी केंद्र स्थापन होणे गरजेचे आहे. दलाल पद्धत बंद होऊन शेतकरी ते ग्राहक हि थेट यंत्रणा सक्षम करणे गरजेचे आहे तसेच शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी लवकरच आवश्यक असलेली शेतीमाल खरेदी केंद्रे स्थापन करण्यासाठी मनसेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे, असे मनसे शेतकरी संघटनेचे सचिव भगवान कांदे यांनी म्हटले आहे.
शासकीय योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी मनसेच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत त्या माध्यमातून आपण शेतकरी वर्गासोबत जोडले जाणार आहोत.येत्या काही दिवसात मनसेच्या शेतकरी सेनेची जिल्हा व तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात येणार असल्याचे या वेळी कांदे यांनी स्पष्ट केले.
या वेळी मनसे जिल्हाध्यक्ष अँड. अनिल केसरकर ,उपजिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ ,तालुका अध्यक्ष मिलिंद सावंत ,सावंतवाडी विधानसभा सचिव गुरुदास गवंडे ,बांदा शहर अध्यक्ष चिन्मय नाडकर्णी ,ग्रामपंचायत सदस्य नरेश देवूलकर ,आंबोली विभाग अध्यक्ष काशीराम गावडे ,विभाग उपाध्यक्ष राकेश परब ,विद्यार्थी सेनेचे साहिल तळकटकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.