पत्रकारांसमोरील बैठकीत ग्रामसेवक व सरपंच निरुत्तर 

आचारसंहिता संपल्यावर तक्रारदारांकडून ग्रा.पं समोर उपोषणाचा निर्धार !

फोंडाघाट,दि.३० मार्च (संजय सावंत)
फोंडाघाट ग्रा.प. समोरील सुशोभीकारणाच्या हेतूने बांधण्यात आलेली भिंत बांधकाम विभागाने अनधिकृत ठरवून बांधकाम विभागाने कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर तसेच उगवाई नदी पत्रात ग्रा.प.साठी संरक्षण भिंत म्हणून बांधण्यात आलेल्या बांधकामा बाबत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश गटविकास अधिकारी यांच्या कडून ग्रा.प. ला आलेले असताना शासन आदेशाकडे दुर्लक्ष केल्याबाबत तक्रारदार समीर सामंत व स्थानिक पत्रकार यांची सरपंच,ग्रा.प. सदस्य आणि ग्रामसेवक यांच्या सह झालेल्या बैठकीत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना सरपंच आणि ग्रामसेवक निरुत्तर झाले होते
फोंडाघाट येथील ग्रामस्थ समीर सामंत यांनी ग्रामपंचायत समोरील सुशोभीकरण आणि सुरक्षिततेसाठी बांधण्यात आलेला गडगा तसेच उगवाई नदी पात्रात ग्रा.प. च्या जमिनीची धूप होण्याची कारने दाखवत बांधण्यात आलेली संरक्षण भिंत याबाबत संभंधित कार्यालयाकडे तक्रारी केल्या होत्या.याबाबत बांधकाम विभागा कडून सुशोभीकरणासाठी विनापरवानगी बांधण्यात आलेला गाडगा अनधिकृत ठरवून याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश फोंडाघाट ग्रा.प. ला देवूनही तसेच ग्रामपंचायतीच्या सुरक्षिततेच्या नावाखाली बांधण्यात आलेल्या उगवाई नदी पत्रातील संरक्षण भिंत याबाबत गटविकास अधिकारी यांनी ग्रामपंचायतीला संभंधित कामाची चौकशी करून अहवाल सादर कराण्या चे पत्र दिलेले असताना याबाबत कित्येक दिवस ग्रा.प. फोंडाघाट कडून कोणतीच कार्यवाही करण्यात न आल्याने तक्रारदार समीर सामंत यांनी ग्रामसेवक विलास कोलते, सरपंच संजना आग्रे, ग्रामपंचायत सदस्य सुभाष सावंत आणि पत्रकार यांचे उपस्थितीत बैठक आयोजित केली होती.
दरम्यान यावेळी या अनुषंगाने तक्रारदार यांनी उपरोक्त कामांबाबत वरिष्ठ कार्यालयाकडून कार्यवाही आदेश आलेले असताना ग्रा.प.फोंडाघाट ने अद्याप का कार्यवाही केली नाही। ? वरिष्ठ कार्यालयांच्या आदेशांना आपण मानत नाही का? काही ठराविकच ठेकेदारांना कामाची कशी वाटणी होते ? जुन्या धर्म शाळेची मोडतोड कोणाच्या परवानगी ने केली? नवीन ग्रा.प. बांधलेली इमारत जमीन एन.ए केलेली आहे का? अशा अनेक प्रश्नाची सरपंच व ग्रामसेवक यांच्या वर सरबत्ती करत् विचारलेल्या प्रश्नाना सरपंच व ग्रामसेवक निरुत्तर झाल्याने फोंडाघाट ग्रा.प . कारभारामध्ये चालेला मनमानी पणा आणि सावळा गोंधळ यावेळी पत्रकारांच्या समोर आणला
मुळात ग्रामपंचायतीची जमीन एन . ए.केलेली नसताना अथवा संबंधित सक्षम अधिकाऱ्याची परवानगी नसताना, लाखो रुपयांचा निधी खर्च ,(याबाबत तपशील दिला नाही) रस्त्यामध्ये गडगा- सुशोभीकरणासाठी लाखो रुपयांचा शासकीय निधी खर्च ,त्यासाठीची टेंडर नोटीस नगण्य वृत्तपत्रात प्रसिद्ध करून, स्थानिक ५/६ ठेकेदारांकडून कामाची बोगस पुर्तता, नदीपात्रातील झाडे तोडून ग्रा. प .लगतच्या कब्जेदारांच्या सर्वे नंबर मध्ये संरक्षक भिंतीसाठी लाखो रुपयांचा खर्च,मात्र यावेळी गावातील शेतकऱ्यांसाठी चार-पाच वर्षे मागणी करूनही संरक्षक भिंतीच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष, याबाबत प्रांत अधिकारी यांनी चौकशी करून अहवाल देण्यास सांगितलेला असताना त्यासाठी दिशाभूल करणारी उत्तरे, काम थांबवण्याचे आदेश असताना ठेकेदाराला बिल अदा करणेबाबत चे पत्र, याची कोणतीही समर्पक उत्तरे ग्रामसेवक देऊ शकले नाहीत.
यावेळी प्रशासनाचा, पर्यायाने जनतेच्या लाखो रुपयांचा निधीचा अपव्य बिनदिकत, हुकूमशाही आणि मनमानी पद्धतीने ठराविक ५/६ स्थानिक ठेकेदार,ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक यांच्या संगनमताने बिनबोभाट सुरू आहे. या सर्व प्रकाराला पाठीशी घालणारे संबंधित खात्याचे अभियंता,प्रांताधिकारी आणि तत्सम अधिकारी यांच्यामुळे याबाबत गेल्या पाच- सहा वर्षाची प्रशासकीय चौकशी होऊन संबंधितावर कठोर कारवाई होऊन,जनतेला सत्य कळावे अशी मागणी यावेळी समीर सामंत यांनी करताना, या भ्रष्टाचाराचे दस्तऐवजच सादर करून भ्रष्टाचाराची पोलखोल केली.. तसेच जनतेच्या पैशाचा काही ठेकेदारच्या फायद्यासाठी अपव्यय करणाऱ्या संभंधितांवर योग्य ती कारवाई न झाल्यास आचारसंहिता समाप्ती नंतर आपण फोंडाघाट ग्रा.प. च्या कार्यालयासमोरच आमरण उपोषणास बसणार असल्याचे तक्रारदार समीर सामंत यांनी यावेळी सांगितले.