विश्वनाथ समीट-५ मध्ये विविध राज्यातील संशोधकांनी केले शोधनिबंध सादर
तळेरे,दि.२ एप्रिल
तळेरे येथील मुंबई विद्यापीठाच्या विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयात “रिसेंट ट्रेंड्स इन कॉमर्स,मॅनेजमेंट,आयटी ॲंड मास मीडिया” विषयावर एक दिवसीय आभासी राष्ट्रीय परिषदेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. विविध राज्यातील चाळीस संशोधकांनी शोधनिबंध सादर केले.
डॉ.सुभाष पवार- संशोधक मार्गदर्शक,एमजीएम विद्यापीठ संभाजीनगर, डॉ.गणेश मर्गज- एसपीके कॉलेज सावंतवाडी, डॉ.संतोष मेंगाळ- उप प्राचार्य एएससी कॉलेज मोखाडा, डॉ.ओंकार घाटगे -विभाग प्रमुख आयटी विभाग देवगड कॉलेज व श्रीपाद वेलिंग, प्र.संचालक, सिंधुदुर्ग उपपरिसर, मुंबई विद्यापीठ व समन्वयक दळवी महाविद्यालय हे उपस्थित होते.
राष्ट्रीय परिषदेची सुरुवात राष्ट्रगीताने झाली.सहा.प्रा.हेमंत महाडीक यांनी मान्यवरांचे स्वागत केले.यावेळी बोलतांना ते म्हणाले की, दळवी कॉलेज मागील चार वर्षापासून चर्चासत्राचे करत आहे. विनायक दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना महामारीच्या काळात,राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन महाविद्यालयाने केले.
श्रीपाद वेलींग अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, सर्वच क्षेत्रांचा कल बदलत आहे ऑफलाईन पेक्षा ऑनलाईनला महत्व दिले जात आहे. कॉमर्स,आयटी,मास मिडीया हि सर्वच क्षेत्र विस्तारली आहेत. आलेल्या सर्व मार्गदर्शकांचे,संशोधकांचे महाविद्यालयाच्या वतीने त्यांनी आभार मानले.
डॉ.गणेश मर्गज आपल्या भाषणात बोलतांना म्हणाले की, भारतात सर्वात जास्त सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कंपन्या निर्माण झाल्या आहेत. आपले सॉफ्टवेअर इंजिनिअर बऱ्याच देशांना सेवा प्रदान करतात. या सोबत सर्वच क्षेत्रांमध्ये संधी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
डॉ.सुभाष पवार बोलतांना म्हणाले की, आयटी सोबत प्रत्येक क्षेत्रात एआय टूल्सचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे, यामुळे एका क्लिकवर सर्वच प्रकारची माहिती प्राप्त होते. ग्राहकांची गरज त्या पद्धतीची सेवा देण्याची क्षमता विविध वेबसाईट मध्ये निर्माण झाली आहे. आपल्या भाषणात परिषदेतील सर्वच विषयांचा आढावा त्यांनी घेतला. राष्ट्रीय परिषदेचे सूत्र संचालन कु.हितेश मंचेकर या विद्यार्थ्याने केले. निकाल घोषित व आभार प्रदर्शन महाविद्यालयाचे सहा.प्रा.नरेश शेटये यांनी केले. उत्कृष्ट शोधनिबंध सादरीकरनाचा निकाल घोषित करण्यात आला. यात अनुक्रमे प्रथम निनाद दाणी, द्वितीय रश्मी राजा, तृतीय प्रकाश तळणकर व उतेजनार्थ नरेश शेटये यांना गौरविण्यात आले. राष्ट्रीय परिषद यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.