सावंतवाडी,दि. ३ एप्रिल
फळबागायतदार शेतकऱ्यांना मी ताटकळत ठेवले नाही. माझ्या पुर्व नियोजित बैठकीमुळे विलंब झाला. त्यामुळे आता पुन्हा शुक्रवार दि.५ एप्रिल रोजी बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे अशी माहिती शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांनी दिली.
केसरकर म्हणाले,आपली पूर्वनियोजित सुरू असलेली मीटिंग संपण्यास उशीर झाल्याने आपणास सदर फळबागायदार मीटिंग ठिकाणी पोहचण्यास विलंब झाला असे स्पष्टीकरण शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिले आहे. आता त्यांना शुक्रवार दि.५ एप्रिल रोजी भेटीची वेळ दिली असल्याची माहिती त्यांनी दिली.
शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारचा गैरसमज करून घेऊ नये असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले आहे. यावेळी आपणाला मीटिंग साठी येण्यास उशीर होईल, आपण सर्व पदाधिकाऱ्यांनी थोडा वेळ थांबावे असा निरोप फोन वरून दिला होता.परंतु, पदाधिकारी निघून गेले होते असे ही ते यावेळी म्हणाले.