मुक्तांगणच्या बालचमूने स्नेहमेळाव्यात उडविली धमाल
पालकांनीही केली मुक्तांगणची उपक्रमाची प्रशंसा
वेंगुर्ले, दि.५ एप्रिल
बालवयात आनंदाचे, प्रेमाचे, श्रध्देचे, समतेचे आणि माणुसकिचे संस्कार व्हावे लागतात आणि सुरांची जादू मेंदुच्या वाढीसाठी विलक्षण जादूई असते, ती देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आम्ही शिकवत नाही शिकतो असे मत मुक्तांगणच्या संचालिका सौ मंगळ परूळेकर यांनी मुक्तांगणच्या स्नेहमेळावा व वार्षिक पारीतोषिक वितरण कार्याक्रमांत केले.
मुक्तांगणच्या स्नेहमेळाव्यात मुक्तांगण महिला मंचातील पालकांनी केलेल्या विठोबा-रखुमाई सह संतांच्या केलेल्या वेशभुषेतून वारकरी नृत्य व मुक्तांगणमध्ये शिकणारी मुले यांनी रद्दीपासून पोपट, कावळासह अन्य वेशभुषेतून सादर केलेल्या शेतकरी नृत्य, कोळी नृत्य व मुलांच्या भावविश्वातील विविध प्राणी समाजातील घटक, निसर्गाची किमया दाखवत बालचमूने धमाल आणली. लहान मुलांनी सादरीकरण केलेल्या कार्यक्रमांत पालकांनाही त्यांनी सादरीकरण केलेल्या कलेतुन नवीन शिकण्यास मिळाले. चक्क एका दोन पालकांनी तर मुक्तांगण मुलांचे आहेच पण ते पालकांचेही असल्याची प्रतिक्रिया या कार्यक्रमांत व्यक्त केली आहे.
मुक्तांगणच्या बालविकासाचा अभिनव प्रकल्प असलेल्या मुक्तांगण स्नेहमेळावा हा येथील परूळेकर दत्तमंदिर येथे जेष्ठ साहित्यीक आणि विद्यार्थी प्रिय शिक्षक विनय सौदागर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या कार्यक्रमाची सुरूवात वरदा परब हिच्या गणेशवंदनने झाली. या कार्यक्रमाच्या सुरवातीस विविध विषयात प्राविण्य मिळवलेल्या मुलांना श्री. व सौ. सौदागर, अँड देवदत्त परूळेकर, मुक्तांगणच्या संचालिका सौ. मंगल परूळेकर, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख कैवल्य पवार व प्रा. महेश बोवलेकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरवात रद्दीपासून वेशभूषा या उपक्रमांतर्गत दर्शा नवार, राघव बांदवलकर, यशस्वी परब, काव्या परब, अब्देत परब, शौर्या धुरी, रेयांश गायकवाड व आराध्या बोवलेकर यांनी सादर केलेली कला सर्वांना थक्क करणारी होती. डॉ. तनिशा धुरी यांनी गणेश वंदनेने या कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली. शेतकरी नृत्य, कोळी नृत्य व मुलांच्या भावविश्वातील विविध प्राणी समाजातील घटक, निसर्गाची किमया दाखवत बालचमूने धमाल आणली.
यंदाचं वर्ष हे सानेगुरुजीच जन्मशताब्दी वर्ष, श्यामच्या आईला १२५ वर्ष झाली. श्यामच्या आईला वंदन म्हणून श्यामच्या जीवनातील दोन प्रसंग भुतदया, सौ साक्षी परब, श्लोक परब आणि सानवी परब या माय लेकरांनी सादर केला. तसेच सौ. आरती बांदवलकर आणि कु. राघव बांदवलकर यांनी मुकी फुले हा प्रसंग सादर केला आणि प्रेक्षक भारावून गेले. बालगीतातील कु. अब्दैत परब-पोपट, कु श्लोक परब कावळा, चंद्र-सुर्य कु. अव्दैत खानोलकर प्रेक्षणीय ठरले. ‘देव एकच आहे’, ‘या विश्वावर प्रेम करा’ हा संदेश रेयांश गायकवाड, श्लोक परब, युवराज पाटोळे, महेंद्र रेडकर, जन्मय मसुरकर, आणि अव्दैत परब, परी पटेल, दक्षा नवार यांनी दिला. समाजाचे घटक दाखविताना म्हातारी झालेली बिरा तारी जास्तच चपळ म्हातारी दिसत होती.
शिक्षण मुलांचे, सहभाग पालकांचा उपक्रमातंर्गत सुजाण पालक केंद्रातर्फे शेतकरी नृत्य सादर करण्यात आले. सौ. जागृती शेटये, सौ. नुतन दाभोलकर, सौ. भारती बांदवलकर, डॉ. सौ. स्नेहा नवार, डॉ. सौ. तनिशा धुरी, सौ. साक्षी परब, सौ. श्रध्दा बोवलेकर, सौ. तेजल तारी यांचा नृत्यातील सहज सहभाग प्रेक्षणीय ठरला. सौ. नुतन दाभोलकर यांनी सादर केलेल कोळीनृत्य विशेष लक्षणीय ठरले.
मुक्तांगण महिला मंचातील सौ. संजना तेंडोलकर (विठोबा), सौ. रूपा शिरसाट- (रुक्मीणी), सौ. माधवी मातोंडकर (संत तुकोबा), सौ. दिव्या आजगांवकर (संत सावतामाळी), सौ. दिपा वाडेकर (संत कबीर), सौ. स्वाती बांदेकर (संत नामदेव), सौ. मंजिरी केळजी (संत जनाबाई), वारकरी महिला सौ. निलम रेडकर, सौ. माहेश्वरी गवंडे, सौ. साक्षी वेंगुर्लेकर यांनी वारकरी नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. याच महिलांनी मुलांसाठी ‘नाचरे मोरा’ हे बालगीत सादर केले.
सुजाण पालक केंद्रातर्फ सौ. गौरी खानोलकर, सौ. साक्षी परब, सौ. तेजल तारी, सौ. सुप्रिया राऊत यांनी स्वागतगीत आपल्या सुरेल आवाजात सादर केले. प्रा. वसंतराव पाटोळे व सौ. राजश्री गायकवाड यांनी मुक्तांगण मुलांचे आहेच, पण ते पालकांचेही आहे. मुक्तांगणतर्फे राबविण्यात येणारे प्रकल्प, उपक्रम हे कुठेही दिसून येत नाही. दिवसेदिवस आव्हानात्मक होणारं पालकत्व पेलताना पालक असण्यातला आनंद इथे अनुभवता आला अशा भावना व्यक्त केल्या.
हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता मुक्तांगणच्या सहशिक्षिका सौ. निलांगी करंगुटकर, सौ. गौरी माईणकर, सौ. प्रिती राऊत यांनी विशेष परीश्रम घेतले. वेशभूषा आणि रंगमंच व्यवस्थेसाठी गणेश माईणकर यांचे सहकार्य लाभले. नृत्या दिग्दर्शन ओंकार तुळसकर, सौ. रिया केरकर आणि सौ. मंगल परूळेकर यांनी केले. हार्मोनियम श्री. नरसुले काका व तबला पिंट्या वेतुरकर लाईट लुईस आणि सर्वात महत्वाचे आवाज म्हणजे साऊंड सिस्टीमचे काम भानू मांजरेकर यांनी केली त्यामुळे कार्यक्रम यशस्वी होऊ शकला. यावेळी सौ. दिव्या आजगांवकर यांनी आभार व्यक्त केले.
नियोजन बध्द आणि सुसूत्रता असलेला हा स्नेहमेळावा यादगार ठरला. शेवटी पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील नामवंत साहित्यीक, शिक्षण संस्था, सामाजिक कार्यकर्ते, संस्था यांचे संदेश आले होते. सुपुर्ण वेंगुर्ला तालुका व जिल्ह्यातील अनेक संस्थांचे मान्यवर उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते अभि वेंगुर्लेकर व श्रीमती लता वेंगुर्लेकर यांनी मुक्तांगणचे शुभेच्या देवून विशेष कौतुक केले.