लोकसभा मतदारसंघातून उमेदवार किरण सामंत उर्फ भैय्या सामंत असावे-तालुका प्रमुख विलास साळसकर
देवगड, दि.९ एप्रिल
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ जाहीर झाली असून रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून अद्याप महायुतीची उमेदवारी अजून निश्चित झाली नाही प्रत्येक जण उमेदवारी आपल्याला मिळाली पाहिजे या प्रतीक्षेत आहेत तळकोकणात सर्वसाधारण विचार केला तर इथल्या जनतेची नाळ हि कित्येक वर्षे शिवसेना पक्षासोबत एकनिष्ठ जोडलेली आहे धनुष्य बाण निशाणी दिसली की कोंकणी जनता उमेदवार कोण आहे याचा विचार करत नाही, व मतदान करते.
सध्याच्या परिस्थितीत शिवसेनेत विभागणी झाली असली तरी सर्वसामान्य जनता ही धनुष्य बाण निशाणी बरोबर एकनिष्ठ राहीलेली आहे, जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी यांनी शिवसेना पक्षांचा उमेदवार किरण सामंत उर्फ भैय्या सामंत असावा अशी आपली मागणी मुख्यमंत्र्यांकडे लावून धरली आहे .अशी प्रतिक्रिया देवगड तालुका प्रमुख विलास साळसकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केली आहे.
रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व सामान्य जनतेला पण भैय्या सामंत हेच भावी खासदार व्हावेत अशी इच्छा आहे. येथील जनता भैय्या सामंत यांच्या प्रचारासाठी सज्ज असून उमेदवारी जाहीर होण्याची चातकासारखी वाट पाहत आहेत, प्रत्येक तालुक्यात बुथनिहाय बांधणी झालेली असून प्रत्येक बुथवर तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी यांनी पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बांधणी केली आहे .आज महाराष्ट्रात नामदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी उठाव केला म्हणून पुन्हा महाराष्ट्र मध्ये शिवसेना भाजपा युतीचं सरकार स्थापन झाले.परंतु आज मित्रपक्ष भाजपा मोठा भाऊ म्हणून वावरत असला तरी त्यांनी मोठेपणा दाखवणे गरजेचे आहे कुठलाही मोठा भाऊ छोट्या भावाचा संसार पण सुरळीत चालला पाहिजे याची काळजी नक्कीच घेणार असा ठाम आत्मविश्वास जिल्ह्यातील जनतेला आहे, भैय्या सामंत हे एक संवेदनशील नागरिक आहेत सर्वसामान्य जनता कार्यकर्ते यांची कामं करण्याची एक वेगळीच शैली त्यांच्याकडे आहे .म्हणून ते आज मतदार संघात लोकप्रिय आहेत, तळमळीने तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्ते यांना बळ देऊन सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी ते तत्पर असतात .त्यांचा कामांत उच्च नीच जात भेदभाव कधीच आढळून येतं नाही. भैय्या सामंत यांनी कुठलेही काम करतो असं सांगितलं की ते झालेच पाहिजे हि त्यांची ख्याती सर्वसामान्य जनतेला ज्ञात आहे, रत्नागिरी सिंधुदुर्ग मधील सर्व जनतेची पदाधिकारी कार्यकर्ते यांची किरण सामंत उर्फ भैय्या सामंत यांनाच लोकसभेची उमेदवारी निश्चित मिळणार, रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात बदल हा घडणार घडवण्यासाठी सर्व जनता पदाधिकारी कार्यकर्ते तत्पर आहेत असेही त्यांनी नमूद केले आहे.