देवगड येथून सुटणारी शयनासनी सेवा कोलमडली !

देवगड आगार व विभागीय कार्यालयाच्या कारभाराबाबत प्रवासी वर्गातून तीव्र संताप व्यक्त…

देवगड, दि.११ एप्रिल (दयानंद मांगले)
राज्य परिवहन महामंडळाच्या देवगड आगारातून सुटणारी एकमेव मुंबई मार्गावरील रातराणी आणि शयनासनी प्रवासी फेरी वरील दोन्ही गाड्या या पासिंग च्या अनुषंगाने विभागीय कार्यशाळेत गेल्या असून त्या आजपर्यंत पंधरा दिवस उलटले तरी देखील आगारात पासिंग होऊन दाखल झालेल्या नाहीत .पर्यायाने या मार्गावर साधी, विठाई प्रवासी फेरी सोडण्यात येत आहे. ऐन उन्हाळी हंगामात साधी प्रवासी फेरी सोडल्याने प्रसंगी आगाऊ आरक्षण केलेल्या प्रवासी वर्गाची कुचंबना होत आहे. परंतु त्याच बरोबर प्रवासादरम्यान देण्यात येणारी आसने ही मागेपुढे होत असल्यामुळे त्याचबरोबर शयनासनी प्रवासी फेरी म्हणून आरक्षण केलेल्या प्रवाशांना त्रास होत असल्याने चालक वाहक त्याचप्रमाणे आरक्षण खिडकीवरील वाहतूक नियंत्रक याना प्रवासी वर्गाकडून विचारल्या जाणाऱ्या जाबाला सामोरे जावे लागत आहे.
विभागीय कार्यालयाकडून वास्तविक पर्यायी प्रवासी गाड्या उपलब्ध करून देणे आवश्यक असतानाही असताना तसे न होता पासिंग करण्याची प्रक्रिया देखील वेळीच पार पाडली जात नसल्यामुळे विभागीय कार्यालयाच्या कारभाराबाबत प्रवासी प्रवासी वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. राज्य सरकारने महिलांना ५० टक्के प्रवास भाड्यात सवलत ज्येष्ठ नागरिकांना ५०टक्के सवलत,अमृतमहोत्सवी प्रवासी मोफत, प्रवास ,यामुळे एकमेव देवगड बोरिवली प्रवासी फेरी जाता येता पूर्णतः नियमित आरक्षित असल्याने वाटेतील प्रवासी वर्गांना या गाडीत प्रवेश मिळत नाही .त्यामुळे तालुक्यातील नजीकच्या परिसरातील प्रवासी वर्गाची गैरसोय होते.या मुंबई मार्गावर अन्य कोणतीही प्रवासी फेरी हंगामात सुरू केली जात नाही. प्रसंगी देवगड नालासोपारा प्रवासी फेरी व्हाया बोरिवली अशी मागणी वारंवार होत असतानाही व प्रवासी फेरीला चांगला प्रतिसाद असताना ती देखील अद्याप सुरू करण्यात आलेली नाही .प्रसंगी सुरू होण्यापूर्वीच बंद करण्याचा उपद्व्याप केला जातो.हेही अयोग्य असून गाड्याची कमतरता ,जुन्या गाड्या लांब पल्ल्याच्या प्रवाशांची होणारी परवड यामुळे प्रवासी वर्ग एन उन्हाळी हंगामात हैराण झाले असून याकडे विभागीय कार्यालय चे पूर्णतः दुर्लक्ष होत आहे.अन्य आगारात हंगामी नवनवीन प्रवासी फेऱ्या सुरू होतात मग देवगड आगार या कडे दुर्लक्ष का करते?
गेल्या १०/१२ वर्षात देवगड आगारात एकही नवीन गाडी आलेली नाही, शयनासनी दोन गाड्या आल्या त्या नादुरुस्त झाल्या अथवा पसिंगला गेल्या तर विभागीय कार्यालयाकडे पर्यायी व्यवस्था नाही आगार पातळीवर फक्त शनायसनी ऐवजी साधी गाडी सोडण्यात येईल असे सांगून शांत प्रवासी वर्गाच्या सहनशीलतेचा अंत तर विभागीय कार्यालय पहात नाही ना?दरम्यान विभागीय कार्यालयात दोन्ही शयनासनी गाड्या पसिंग करिता सज्ज असल्याचे समजते.परंतु पासींगचे आवश्यक ते चलन भरणा न केल्याने पासिंग रखडले आहे असेही कळते ,याला जबाबदार कोण?येत्या शनिवार पर्यंत शयनासनी प्रवासी फेरी सोडण्यात न आल्यास शनिवारी सुटणारी बोरिवली प्रवासी रोखण्याचा आक्रमक पवित्रा स्थानिक प्रवाशांना घेतला आहे.यात कायदा सुवव्यस्था चा प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्वी विभागीय कार्यालय जबाबदार राहील.