केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी मिळावी म्हणून भाजपा प्रदेशकडे मागणी-अध्यक्ष आमदार आशिष शेलार

सावंतवाडी दि.१३ एप्रिल 
उध्दव ठाकरे यांचे पुत्र प्रेम आणि शरद पवार यांचे पुत्री प्रेम यामुळे अनुक्रमे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मतभेद होवून फुट पडली असा दावा मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी केला.

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवाराचे नाव लवकरच जाहीर होईल. मात्र भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी हा मतदारसंघ भाजपला मिळावा आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी मिळावी म्हणून भाजपा प्रदेशकडे मागणी केली आहे, अशी माहिती मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा उपाध्यक्ष संजू परब, जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, तालुकाध्यक्ष रवींद्र मडगावकर, शहराध्यक्ष अजय गोंदावळे ,विनोद सावंत, केतन आजगावकर,दिलीप भालेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
शेलार म्हणाले, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार लवकरच जाहीर होईल तो नरेंद्र मोदी समर्थक महायुतीचा उमेदवार असेल. या लोकसभा मतदारसंघात विकास अपेक्षित होता तो विनायक राऊत यांनी केला नाही त्यामुळे त्यांच्या पराभव करण्याच्या साठी केंद्रीय मंत्री नारायण राणे हे ठिकठिकाणी सभा घेत आहे. महायुतीचा उमेदवार जाहीर झाला नसला तरी नारायण राणे हे केंद्रीय मंत्री आणि ते भाजपचे नेते आहेत .त्यामुळे महायुतीच्या प्रचारासाठी फिरत आहे. विनायक राऊत यांचा पराभव करून मोदींना भक्कम पाठिंबा देणारा उमेदवार या ठिकाणाहून विजयी होईल असा दावा त्यांनी केला.
लोकसभा निवडणूक उमेदवार जाहीर करुन स्पष्टता येत नसल्याने कार्यकर्तात जोष आला नसेल तर तो येईल. राज्यात महायुतीच्या जागावाटपा बाबत वाद-विवाद किंवा चढाओढ नाही. मात्र प्रत्येक पक्षाला उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे असे आशिष शेलार यांनी सांगून मोदी परिवार वाढला पाहिजे आणि मोदी परिवाराचे सेवक म्हणून काम केले पाहिजे अशी धरणा आम्हा सर्वांची आहे, असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले,उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिक मुख्यमंत्री होईल असे म्हटले होते. मात्र ते स्वतः मुख्यमंत्री झाले. त्यांचा अहंकारी स्वभाव आणि पुत्र प्रेमामुळे शिवसेना तर शरद पवार यांचे पुत्री प्रेम, धरसोड वृत्ती मुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडली. ते धक्कातंत्र भाजपने नव्हे तर स्वतः त्यांनी करवून घेतले आहे.
इडी कारवाई झालेले ८० ते ९० टक्के लोक निर्दोष आहोत असे म्हणत नाहीत तर राजकीय द्वेषातून कारवाई केली असे म्हणत आहेत असे त्यांनी एका प्रश्नावर उत्तर देताना सांगितले.
तसेच भाजपमध्ये आल्यावर भ्रष्ट आहेत असे म्हणणारे त्यांच्यासोबत असताना तसे म्हणत नव्हते

शेलार म्हणाले,कोकण सिंधुदुर्गचा विकास झाला आहे तो बॅरिस्टर नाथ पै,प्रा. मधु दंडवते ते सुरेश प्रभू आदींच्या माध्यमातून झाला आहे. तो कोणी नाकारण्याचा प्रश्नच नाही. मात्र सन २०१४ मध्ये केंद्र सरकार आले त्यानंतर विकासाची नव नवीन दालने या मतदारसंघात आणण्यास खासदार विनायक राऊत कमी पडले त्यामुळे या ठिकाणी भाजप महायुतीचा उमेदवार विजयी व्हायला हवा असे शेलार म्हणाले. राऊत यांच्या पराभवासाठी महायुती एकत्रितपणे प्रचार करेल असे त्यांनी सांगितले.