वेंगुर्ला,दि.१३ एप्रिल
तालुका विधी सेवा समिती, वेंगुर्ला व तालुका बार असोसिएशन, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने उच्च न्यायालय महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग-ओरोस यांनी दिलेल्या निर्देशांस अनुसरुन दि. ५ मे २०२४ रोजी दिवाणी न्यायालय, वेंगुर्ला येथे सकाळी १०.३० वाजता राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकअदालत पक्षकारांच्या हितासाठी असून त्यातून त्यांना कमीत कमी वेळांत, कमीत कमी खर्चात प्रभावी न्याय मिळू शकतो. ज्या पक्षकारांची प्रलंबित असलेली दिवाणी व फौजदारी प्रकरणे, कौटुंबिक वाद, पोटगी आदी प्रकरणे तसेच वीज वितरण कंपनी, दुरसंचार निगम, वित्तीय संस्था, बँका, ग्रामपंचायत यांनी आपली जास्तीत जास्त प्रकरणे दाखल करून वादपूर्व प्रकरणे तडजोडीने मिटविण्यांत यावी यासाठी पक्षकारांनी उपस्थित राहून खटले
मिटवावेत. त्याकरिता संबधितांनी दिवाणी न्यायालय, वेंगुर्ला (दुरध्वनी क्र.०२३६६-२६२७०७) येथे संफ साधावा.
तसेच ज्या पक्षकारांना आपले प्रकरण चर्चेद्वारे मिटवायचे असेल अशा पक्षकारांनी वादपूर्व चर्चेसाठी या न्यायालयात हजर रहावे किवा फोनद्वारे या न्यायालयात संफ साधावा. त्यानुसार दोन्ही पक्षकारांना चर्चेची तारीख व माध्यम ठरवून दिले जाईल.
ज्या पक्षकारांचे न्यायालयात प्रलंबित असलेले दिवाणी व फौजदारी खटले किवार राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका, ग्रामपंचायत कडील वादपूर्व प्रकरणे तडजोडीने मिटवायंची आहेत, त्यांनी आपली प्रकरणे तालुका विधी सेवा समिती, वेंगुर्ला या कार्यालयाकडे लवकरात लवकर दाखल करावीत असे आवाहन दिवाणी न्यायाधीश के.के.पाटील व सहदिवाणी न्यायाधीश डी.वाय.रायरीकर यांनी केले आहे.