सावंतवाडी,दि.१५ एप्रिल
सावंतवाडी दोडामार्ग तालुक्यातील २५ गावात पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र घोषित करण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे यासाठी आवाज व वनशक्ती फाउंडेशनचे श्री स्टॅलिन डी यांनी गेली १४ वर्ष न्यायालयीन लढा लढले आणि मायनिंग विरोधी चळवळीचा विजय झाला म्हणून शेतकरी, बागायतदारांनी त्यांच्या शाल श्रीफळ देऊन आज सत्कार केला.
वनशक्ती व आवाज फाउंडेशनचे श्री स्टॅलिन डी हे आज मुंबई उच्च न्यायालयाचा सावंतवाडी दोडामार्ग तालुका पर्यावरण संवेदनशील क्षेत्र अधिसूचित करण्याच्या निर्णयाबाबत माहिती देण्यासाठी आले होते यावेळी शेतकरी तसेच सावंतवाडी दोडामार्ग तालुका बागायतदार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
श्री स्टॅलिन डी म्हणाले,ज्या ठिकाणी वृक्षतोड झाली आहे तसेच उत्खनन झाले आहे असे दाखवणारे पुरावे आणि फोटो द्यावे आपण न्यायालयात जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व वन उपसंरक्षक यांच्या विरोधात अवमान याचिका दाखल करतो.
यावेळी सावंतवाडी दोडामार्ग तालुक्यातील शेतकरी बागायतदार संघाचे अध्यक्ष विलास सावंत म्हणाले, काजूला जीआय मानांकन मिळाले असल्याने या पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रात फायदा होईल.
यावेळी वनशक्तीचे प्रकल्प संचालक स्टॅलिन डी, असनिये येथील पर्यावरण प्रेमी संदीप सावंत,नंदकुमार पवार,डॉ.जयेंद्र परुळेकर, डॉ सतीश लळीत,अस्मिता एम जे,दत्तप्रसाद पोकळे,संदेश कोलते,अनिल सावंत,सदानंद देसाई,विलास सावंत,रणजित सावंत,महेश ठाकूर,मनोज गवस,चंद्रशेखर गवस,हनुमंत जाधव,अविनाश गावडे,गुरुदास गावडे,संदीप गवस,विलास सावंत,नारायण गावडे,संजय देसाई,मोहन वालावलकर,गीता रणसिंग अनिल परब,यशवंत देसाई,संतोष परब,यशवंत सावंत,कमलाकर सावंत,सतीश घोटगे,दत्ताराम गवस,शशिकांत गवस,अनिल गवस,सचिन गवस,विष्णू घाडी आदी असनिये, तांबुळी,दाभिल,तळकट,झोलंबे,सासोली, सरमळे, तिरवडे, कळणे, घोटगे,आदी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.