देवगड, दि.१५ एप्रिल
सांविधानिक विचारमंच देवगडच्या वतीने देवगडात १४ एप्रिलरोजी छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा ज्योतिराव फुले आणि विश्वरत्न् डॉ.बाबाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. या जयंती निमित्ताने जिल्हास्तरीय खुली निबंध स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती. या निबंध स्पर्धेला उत्सफूर्त प्रतिसाद मिळाला. या निबंध स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्हयातील २३ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेसाठी भारतीय संविधानाची ७५ वर्षे आणि स्त्रीजीवनाचे परिवर्तन, दि प्रॉब्लेम रूपीची १०० वर्षे आणि समाजाचे अर्थकारण, भारतीय संविधान आणि स्त्री शक्ती, आरक्षण आणि सामाजिक परिवर्तन,फुल्यांची पहिली शाळा आणि आजचे स्त्री शिक्षण असे पाच विषय देण्यात आले होते.
या स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम क्रमांकासाठी रोख रूपये ५०००/-सन्मान चिन्ह, , प्रशस्तिीपत्र, व्दितीय क्रमांकासाठी रोख रूपये ३०००/-सन्मान चिन्ह, प्रशस्तिीपत्र, तृतीय क्रमांकासाठी रोख रूपये २०००/-सन्मान चिन्ह आणि रोख रूपये १०००/-सन्मान चिन्ह, प्रशस्तिीपत्र अशी उत्तेजनार्थ तीन बक्षीसे ठेवण्यात आली होती.
फोंडाघाट येथिल संजय शिवाजी तांबे याने लिहीलेला दि प्रॉब्लेम रूपीची १०० वर्षे आणि समाजाचे अर्थकारण या निबंधाला प्रथम क्रमांक मिळाला. तर वेंगुर्ला वजराठ देवभूवाडी येथील पांडूरंग विष्णू दळवी यांचा भारतीय संविधान आणि स्त्री शक्ती हा निबंध द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला आहे. देवगड तुळशीनगर येथील आनंद जाधव यांनी सादर केलेला , भारतीय संविधानाची ७५ वर्षे आणि स्त्रीजीवनाचे परिवर्तन या निबंधला तृतीय क्रमांक मिळाला आहे. संजिव राऊत (जामसंडे समर्थनगर), सुनिल सुर्यवंशी(आरोस मुख्यालय ),आणि रूक्सना इमदादखान बिजली (सावंतवाडी)हे तीन स्पर्धक उत्तेजनार्थ बक्षिसांचे मानकरी ठरले आहेत. परिक्षक म्हणून प्रा.श्रीकांत शिरसाठे, शिक्षकसुनिल जाधव(गोगटे हायस्कूल जामसंडे) प्रा.सिध्दी कदम यांनी कामकाज पाहिले.
या सर्व विजेत्या स्पर्धकांचे तसेच सहभागी स्पर्धकांचे विचारमंचाचे अध्यक्ष के.एस.कदम यांनी विशेष कौतूक केले. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सचिन जाधव डॉ.प्रा.निलेश वानखडे राजेश साळसकर यांनी विशेष प्रयत्न केले याबद्दल सचिव दिलीप कदम यांनी जाहीर आभार व्यक्त केले.
Home आपलं सिंधुदुर्ग फोंडाघाट योथील संजय तांबे जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचा ठरला प्रथम क्रमांकाचा मानकरी