सह्याद्रीच्या कुशीतील ३२ खनिज प्रकल्पांना इको सेन्सिटिव्ह झोन मुळे ब्रेक लागणार

बहुचर्चित शक्तीपीठ महामार्ग या काॅरीडोर मधून जात असेल तर पर्यावरणीय संवेदनशील मुद्दा समोर येणार

सावंतवाडी दि.१६ एप्रिल
सावंतवाडी – दोडामार्ग तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीतील ३२ खनिज प्रकल्पांना इको सेन्सिटिव्ह झोन मुळे ब्रेक लागणार आहे. त्याहीपेक्षा बहुचर्चित शक्तीपीठ महामार्ग या काॅरीडोर मधून जात असेल तर पर्यावरणीय संवेदनशील मुद्दा समोर येणार आहे.

शक्तीपीठ महामार्गाचा आराखडा २५ गावातील इको सेन्सिटिव्ह झोन मधील काही गावातून प्रस्तावित आहे. याबाबत वनशक्ती संस्थेचे विश्वस्त श्री स्टॅलिन डी म्हणाले, पर्यावरणीय संवेदनशील गावाचा विकास पर्यावरण पूरक शाश्वत विकासाच्या संकल्पनेतून होवू शकतो. नियोजित शक्तिपीठ मार्ग इको सेन्सिटिव्ह झोन मधून नेण्यास विरोध राहील. नागपूर ते गोवा असा शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे. सध्या पर्यायी मार्ग सुरू आहेत. त्यामुळे पर्यावरणला त्रास होऊ नये अशी खबरदारी घेतली पाहिजे.

खनिज प्रकल्प होणारच असे मला एका खनिज समर्थकांने सांगितले होते. आज ना उद्या प्रकल्प प्रस्तावित प्रकल्प होतील म्हणून सांगणाऱ्याला मी जीवंत असेपर्यंत प्रकल्प होणार नाहीत असे म्हटले होते असे पत्रकारांशी बोलताना वनशक्ती संस्थेचे विश्वस्त श्री स्टॅलिन डी यांनी सांगितले.
मुंबई उच्च न्यायालयाने पर्यावरणीय संवेदनशील २५ गावातील परिसरामध्ये केंद्र व राज्य सरकारने चार महिन्यांत अधिसूचित केले जावे म्हणून निर्णय दिला आहे ती पत्रकार परिषद घेतली तेव्हा त्यांनी हि माहिती दिली.
दोडामार्ग तालुका हा महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक राज्याच्या सीमेलगत आहे. या परिसरात ५० पट्टेरी वाघांचा संचार आहे. राष्ट्रीय वन्यजीव अभ्यासक संशोधक संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात आढळून आले आहे. त्यामुळे जैवविविधतेने नटलेल्या या परिसरात वन्य प्राणी मोठ्या प्रमाणात आहेत. जेथे वाघ आहेत तो परिसर पर्यावरण पोषक मानला जातो असे श्री. स्टॅलिन डी यांनी म्हटले आहे.
सह्याद्रीच्या कुशीतील आंबोली ते मांगेली परिसरात इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून जाहीर करण्याची मागणी केली आहे. जरुर तर तिलारी आंतरराज्य पाटबंधारे धरण प्रकल्पाच्या जवळपास वन जंगल आहे. तेथे अभयारण्य उभारण्यासाठी प्रयत्न केले तर मानव आणि वन्य प्राणी यांचा संघर्ष टळेल असं आपलं मत आहे असे ते म्हणाले.