सावंतवाडी दि.१८ एप्रिल
अखेर कसंबसं नारायण राणे यांचे तिकीट एकदाचं जाहीर झालं. ज्यांना खरंतर राज्यसभा पुढील सहा वर्षांसाठी मिळायला हवी होती त्यांना मोदी भाजपने लोकसभा लढवण्याची सक्ती केली, असे उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हा प्रवक्ता डॉ जयेंद्र परुळेकर यांनी म्हटले आहे.
डॉ जयेंद्र परुळेकर यांनी याबाबत एक पत्रक प्रसिद्धीस दिले आहे,त्यात म्हटले आहे,बरं मग निदान लोकसभेचं तिकीट तरी निदान पहिल्या किंवा फारफार तर दुसऱ्या यादीत जाहीर होणं अपेक्षित होतं पण तसं झालं नाही. उमेदवारी जाहीर व्हायला तेरावी यादी यायला लागली.
खरं तर हा नारायण राणे यांचा मोदी भाजप यांनी केलेला अपमानच आहे.पण मुग गिळून गप्प बसण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय तरी काय आहे?