नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी हे मतदान आहे त्यामुळे प्रत्येकाने मतदारांपर्यंत पोहोचले पाहिजे-मंत्री दीपक केसरकर

सावंतवाडी दि.१८ एप्रिल 
भाजप आणि शिवसेना महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि माजी आमदार राजन तेली यांनी केले. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी हे मतदान आहे त्यामुळे प्रत्येकाने मतदारांपर्यंत पोहोचले पाहिजे असे स्पष्ट केले.

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामधील सावंतवाडी शहरातील महायुतीच्या समन्वयकांची बैठक आज संपन्न झाली. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर व माजी आमदार राजन तेली यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी सर्वांनी एकजूटीने काम करण्याचे आवाहन केले. तसेच आपल्या मतदारसंघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार असलेल्या मा.श्री.नारायण राणे यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे, असे आवाहन केले.

यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब, अनारोजिन लोबो, भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी,माजी नगरसेवक मनोज नाईक, ऍड.परिमल नाईक, सुधीर आडिवरेकर, राजू बेग, नासीर शेख, उदय नाईक, आनंद नेवगी, दिपाली भालेकर, उत्कर्षा सासोलकर, भाजप शहराध्यक्ष अजय गोंधावळे, महिला शहराध्यक्ष मोहिनी मडगावकर, राष्ट्रवादीचे सुरेश गवस,उदय भोसले, शिवसेना शहराध्यक्ष बाबू कुडतरकर, प्रेमानंद देसाई आदी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी या सर्व पक्षातील महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.