लोकशाही आणि संविधान बाबत जनजागृती करण्यासाठी सावंतवाडी व कुडाळ येथे २१ एप्रिल रोजी जाहीर सभा

सावंतवाडी दि.१९ एप्रिल 
लोकशाही आणि संविधान बाबत जनजागृती करण्यासाठी सावंतवाडी व कुडाळ रविवार दि.२१ एप्रिल रोजी जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.लोकशाही व संविधान हरण करणाऱ्या निर्भय बनो सभेतून प्रश्न उपस्थित करण्यात येणार असल्याची माहिती अँड संदीप निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महाराष्ट्र राज्यात डॉ. विश्वंभर चौधरी व ॲड. असिम सरोदे यांनी सुरू केलेल्या ‘निर्भय बनो’ अभियानाअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी येथे जाहीर सभा रविवार, दि. २१ एप्रिल रोजी. संध्याकाळी . ठीक ६ वाजता गांधी चौक, सावंतवाडी येथे आयोजित केली आहे.असे अँड किशोर वरक यांनी सांगितले.

या सभेस ॲड. असिम सरोदे व डॉ. विश्वंभर चौधरी हे भारतीय संविधान, लोकशाही, आणि सध्याची देशातील परिस्थिती यावर भाष्य करणार आहेत.असे ॲड. किशोर वरक,ॲड. संदिप निंबाळकर, अभियंता नंदू पाटील यांनी माहिती दिली. या सभेचे समन्वयक निर्भय बनो अभियान व आम्ही निर्भय सिंधुदुर्गकर समिती सर्व समन्वयकानी आयोजित केली आहे. सावंतवाडी व कुडाळ येथील सभेत प्रत्येकी दोन हजार नागरिक उपस्थित राहणार आहेत अशी अपेक्षा आहे असे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्यात आणि कोकणात निर्भय बनो अभियानांतर्गत नागरिकांत जनजागृती करण्यात येत आहे असे अँड संदीप निंबाळकर यांनी सांगितले. लोकशाहीचे चारही स्तंभ आज हरण केले जात आहेत. आमदार आणि खासदार विजयी झाल्यानंतर ईडी.चा धाक दाखवून पळवून नेलेले आहेत. पत्रकारीता, न्यायालय अशा प्रत्येक पातळीवर लोकशाही आणि संविधान गुंडाळून ठेवले आहे. याबाबत जनजागृती केली जाईल. सत्ताधाऱ्यांना यामाध्यमातून प्रश्न विचारले जातील. कोणाही व्यक्ती किंवा राजकीय पक्षांच्या विरोधात हे निर्भय बनो अभियान आहे असे अँड संदीप निंबाळकर यांनी सांगितले.
अभिनेता नंदू पाटील म्हणाले, लोकशाही, संविधान अभ्यासून जनतेला जागृत केले पाहिजे. मणिपूर मध्ये स्त्रीयांना झालेल्या त्रासाबद्दल पंतप्रधान व राष्ट्रपती यांनी कोणत्याही प्रकारची खबरदारी घेतली नाही असे प्रश्न विचारले जातील.