विनाशकारी प्रकल्प आणण्यासाठी राणे यांना सुपारी देऊन उमेदवारी भाजपने बहाल केली

कितीही वावड्या उठवा मी शिवसेनेतच कायम राहणार भाजपा प्रवेशाच्या बातम्यांना सतीश सावंत यांचा पूर्णविराम

देवगड,दि.१९ एप्रिल

भाजपा आणि राणेंनी कायम फोडा फोडीचे राजकारण केले मात्र फोडाफोडीचे परिणाम त्यांना २०१४ च्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीत भोगावे लागले व पितापुत्रांना पराभव पत्करावा लागला.यामुळे कीतीही फोडाफोडी करा तेवढे मताधीक्य वाढेल असा इशारा शिवसेना उबाठा गटाचे नेते सतीश सावंत यांनी दिला.फोडाफोडीची किंमत भाजपला ४ जुनला दिसेल असे सांगून विनाशकारी प्रकल्प आणण्यासाठी नारायण राणे यांना सुपारी देवून उमेदवारी भाजपाने बहाल केली आहे असा घणाघाती आरोप सतीश सावंत यांनी केला.कीतीही वावड्या उठवा मी शीवसेनेतच कायम राहणार असे सांगून भाजपा पक्षप्रवेशाच्या बातम्यांना त्यांनी पुर्णविराम दिला.

शिवसेना(उबाठा) देवगड संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सतीश सावंत यांनी राणे आणि भाजपावर कडाडून टीका केली.यावेळी तालुकाप्रमुख मिलींद साटम, युवा उपजिल्हाप्रमुख निनाद देशपांडे, नगरसेवक संतोष तारी आदी उपस्थित होते.
सतीश सावंत यांनी भाजपा व नारायण राणे व त्यांच्या कुटूंबियांवर घणाघाती टीका केली. खासदार विनायक राऊत यांचा १० वर्षाचा हीशोब मागत आहेत.यांच्याकडे गेली ३४ वर्षे सत्ता, पदे आहेत.कीत्येक टर्म भाजपाचा आमदार असूनही देवगडचा पाणीप्रश्न सोडविता आला नाही.येथील बागायतदारांचे, मच्छिमारांचे प्रश्न सोडविले नाहीत.केवळ विकासकामातुन टक्केवारी हे विद्यमान आमदारांचे व त्यांचा वडीलांचे कर्तृत्व असा घणाघात सावंत यांनी केला.
गिर्ये येथे औष्णिक प्रकल्प पुन्हा आणावयाचा आहे तर नाणार येथे रिफायनरी प्रकल्पाचे विस्तारीकरण करायचे आहे.हे प्रदुषणकारी विनाशकारी प्रकल्प आणण्यासाठीच भाजपाने नारायण राणे यांना सुपारी देवून उमेदवारी दिली आहे.कीरण सामंत यांना उमेदवारी हवी होती मात्र त्यासाठी राणे यांना भाजपाच्या १३ व्या यादीपर्यंत वाट बघावी लागली.हाच कीरण सामंत यांच्यासमोर राणे यांचा नैतीक पराभव आहे असा टोलाही सावंत यांनी लगावला.आता निशाणीचा संभ्रम मतदारांसमोर राहणार नाही कारण शिववसेनेचे धनुष्य चिन्ह नाही. रत्नागिरी सिंधुदूर्ग लोकसभा मतदारांना धनुष्यबाण निशानीची सवय झाली होती मात्र कमळ चिन्हाची सवय नाही.यामुळे आता निशानीचा संभ्रम मतदारांसमोर राहणार नाही.कीरण सामंत यांच्या नाराजीचा तसेच जनताही कायम नाराज असल्याने या नाराजीचा फटका भाजपाला बसेल.
दुस-या पक्षाचे सरपंच, पदाधीकारी, काही कार्यकर्ते फोडायचे हे राणे व भाजपा यांचे कायमचे सुरू आहे परंतू कार्यकर्ता, पदाधीकारी फोडून पक्ष वाढत नाही तर सर्वसामान्य जनता व मतदार फोडू शकत नाहीत.फोडाफोडीची सुज ४ जुनला उतरेल असा इशारा सावंत यांनी दिला.भाजपा व राणे यांनी फक्त फोडाफोडीचे राजकारण सुरू केले आहे.एखादा सरपंच, कार्यकर्ता फोडून निवडणुक जिंकता येत नाही याची प्रचीती त्यांनी २०१३-१४ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये घेतली आहे.त्यावेळी शिवसेनेचे सात जिप.सदस्य फीडले मात्र त्यांनतर त्यांचा विधानसभा निवडणुकीत व मुलाचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला.त्यामुळे जेवढे कार्यकर्ते,पदाध{कारी फोडतील तेवढे मताधीक्य वाढेल कारण जनताच यांच्यावर नाराज आहे असे सतीश सावंत यांनी सांगीतले.मी भाजपा पक्षात प्रवेश करणार अशा वावड्या आ.नितेश राणे आणि त्यांचे कार्यकर्ते करीत आहेत मात्र मी आता कुठेही जाणार नाही.ज्या पक्षाने मला प्रवेश देवून तात्काळ विधानसभेची उमेदवारी देवून माझा सन्मान केला त्या पक्षाला व नेतृत्वाला सोडून मी कुठेही जाणार नाही.कारण मी मुळात नितेश राणे या व्यक्तीमत्वाला कंटाळून शिवसेनेत आलो.त्यामुळे मी तीथेच राहणार.मला उमेदवारी दिल्यानंतर काहीही नसताना १२ दिवसात प्रचार करून ५८ हजार मते घेतली.वावड्या उठवणारांना त्या उठवून समाधान करून घेवू दे असे सावंत यांनी सांगीतले.