काजू ला हमीभाव नाही मात्र सोनं महागले. काजू दर कमी होण्यास भाजपचे केंद्र व राज्य सरकार जबाबदार

भवानीच्या मशालीचा वापर राजकीय विरोधकांचा मतांच्या रूपाने नायनाट करा-खासदार विनायक राऊत

सावंतवाडी दि.२३ एप्रिल 
काजू ला हमीभाव नाही मात्र सोनं महागले. काजू दर कमी होण्यास भाजपचे केंद्र व राज्य सरकार जबाबदार आहे. सोनं महाग करतात,मग काजू ला हमीभाव देण्याचा प्रयत्न का केला नाही. मोदी शहा गुजरात चे व्यापारी मुंबई तोडण्यासाठी शिवसेनेत फोडाफोडी केली. भवानीच्या मशालीचा वापर राजकीय विरोधकांचा मतांच्या रूपाने नायनाट करा असे आवाहन इंडिया महाविकास आघाडीचे ठाकरे शिवसेनेचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांनी केले.
इंडिया महाविकास आघाडीचे उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्या प्राचारार्थ इन्सुली बांदा जिल्हा परिषद मतदार संघाची सभा इन्सुली येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी उमेदवार खासदार विनायक राऊत बोलत होते. यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले,ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते ,महिला जिल्हा संघटक जान्हवी सावंत,आप चे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हाणकर, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला अध्यक्षा सौ अर्चना घारे, ठाकरे शिवसेना मतदार संघाचे संपर्कप्रमुख शैलेश परब,तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, समन्वयक बाळा गावडे, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते विकास सावंत,अँड दिलीप नार्वेकर, रमेश गावकर,समीर वंजारी, चंद्रकांत कासार, पुंडलिक दळवी,मायकल डिसोझा, कौस्तुभ गावडे, महेंद्र सांगेलकर, सचिन पालव, विष्णू परब,भारती कासार, इफ्तिकार राजगुरू आदी उपस्थित होते.

इंडिया महाविकास आघाडीचे उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार खासदार विनायक राऊत म्हणाले, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेच्या कृपेने इथपर्यंत आलो. दिवसेंदिवस महागाई वाढली. सोनं महागले. काजू बागायतदारांना हमीभाव नाही. सोन्याच्या हुंडा मागायचा नाही. सोनं महागले मात्र काजूला हमीभाव नाही. दिपक केसरकर यांनी दोन कोटी रुपयांची व्हॅनिटी व्हॅन वापरतात. मात्र शेतकऱ्यांच्या उत्पादनात भाव नाही. आपला काजू परदेशवारी करायचा पण भाजपने निर्यात होणाऱ्या काजू बी वर बंदी आणून परदेशी चव नसणारे काजू आयात धोरण स्वीकारले त्यामुळे काजू भाव घसरले त्याचे उत्तर भाजप, दिपक केसरकर यांच्या कडे मागा. मी संसदेत काजू आयात शुल्क वाढीची मागणी करत काजू धोरणाबाबत मागणी केली. भाजप च्या केंद्र व राज्य सरकारने काजू ला दराबाबत निकारले.
विनायक राऊत म्हणाले, दोडामार्ग मध्ये ५०० प्रकल्प आणि जर्मनी मध्ये नोकरी देणार म्हणून सांगता मग मालवण मध्ये माशां पासून तेल बनविणाऱ्या कारखान्यात परप्रांतीय कामगार आहेत. या ठिकाणी स्थानिकांना स्थान नाही.मी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणले. त्यांच्या सारखे स्वतः साठी वैद्यकीय महाविद्यालय, इंजिनिअरिंग कॉलेज आणले नाही. सावंतवाडी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला जागा मिळेना मग ते वेत्ये या ठिकाणी करा असे म्हटले. लोकांना मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सेवा केव्हा होणार आहे.
विनायक राऊत म्हणाले, दिपक भाईना नोकरी असेल तर ड्रायव्हर म्हणून नारायण राणे यांच्या मुलाने सांगितले त्यांचीच रि ओढतात. बाळासाहेब ठाकरे, कोकणाचे दैवते आणि आपलं आर्शिवाद आहेत. त्यामुळे लिंबू चालणार नाही.

माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले म्हणाले, मोदी विरोधी लाट उसळली आहे.असे मतदार संघातील दौऱ्यात दिसत आहे. इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांनी हाती मशाल घेतली आहे. ती भगवी लाट विनायक राऊत यांच्या तिसऱ्यांदा विजयासाठी उसळली आहे. आमदार दीपक केसरकर राष्ट्रवादी काँग्रेस, नंतर शिवसेना,मिंदे शिवसेनेत गेले.
यावेळी विकास सावंत, अँड दिलीप नार्वेकर, जान्हवी सावंत, संजय पडते,विवेक ताम्हाणेकर,बाळा गावडे, रूपेश राऊळ, रमेश गावकर आदींनी मार्गदर्शन केले.