जो माणूस आपल्या कामगाराचा रोजीरोटी चा पैसा वेळेवर देऊ शकत नाही ,तो भविष्यातील पिढीला रोजगार काय देणारं ?-विवेक ताम्हणकर

फोंडाघाट,दि.२५ एप्रिल (संजय सावंत)
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आगामी काळात दर्जेदार वैद्यकीय सुविधा प्रभावी म्हणून शासकीय मेडिकल कॉलेज सुरू करण्याचे काम खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून होत आहे . आपल्या जिल्ह्यातील रुग्णाला छोट्या-मोठ्या आजारांसाठी मुंबई, गोवा, कोल्हापूर अशा ठिकाणी धावाधाव करावी लागते.मात्र येणाऱ्या आगामी काळात शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी शिकून येथील दर्जेदार डॉक्टर तयार होतील व येथील रुग्णांची सेवा करतील ही बाब येथील जनतेने लक्षात घेतली पाहिजे मात्र दुसऱ्या बाजूला लोकसभेचे उमेदवार म्हणून उभे असलेले नारायण राणे यांनीःची मेडिकल कॉलेज, स्वतःची हॉस्पिटल, स्वतःचे हॉटेल ,स्वतःचे पेट्रोल पंप काढले आहेत मात्र स्वतःच्या संस्थांमधील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे किती महिन्यांचे पगार नारायण राणे यांनी थकवले आहेत हे मी त्यांच्या एका संस्थेत काही वर्षे काम केले आहे म्हणून अनुभवाने सांगतो आणी त्यांच्या कामगारांना खाजगीत विचारल्यास ते ही सांगतील.जो माणूस स्वतःच्या व्यवसायात काम करणाऱ्या कामगारांचे पगार देऊ शकत नाही,त्यांच्या रोजी रोटी चा पैसा वेळेवर देऊ शकत नाही तो आमच्या भविष्यातील पिढीला काय रोजगार देणार याचा विचार जनतेने करावा असे रोखठोक आरोप आपचे जिल्हा प्रमुख विवेक ताम्हणकर यांनी नारायण रावराणे यांच्यावर केला आहे. ते फोंडाघाट येथे काल झालेल्या शिवसेना इंडिया आघाडी चे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ झालेल्या जाहीर सभेत बोलत होते.
दरम्यान यावेळी व्यासपीठावर खासदार विनायक राऊत , शिवसेना नेते गौरी शंकर खोत, संजय घाडी, अतुल रावराणे ,तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत , युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक,जिल्हा प्रमुख संदेश पारकर, माजी जिल्हा बँक चेअरमन सतीश सावंत , राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर, महिला जिल्हा प्रमुख नीलम पालव , दत्ताराम फोफे, काशीराम राणे, शिवसेना महिला नेत्या संजना घाडी मॅडम,काँग्रेस कार्यकर्ते संतोष टक्के, अरुण म्हसकर, संजना कोलते,महिला तालुकाप्रमुख माधवी दळवी आदी उपस्थित होते
यावेळी बोलताना आपचे जिल्हा प्रमुख विवेक ताम्हणकर पुढे म्हणाले, भाजपा पक्षाचे हिंदू धर्म प्रेम पूर्णपणे बेगडी आहे. नुकत्याच झालेल्या इलेक्ट्रॉल बॉण्ड च्या घोटाळ्यामध्ये भाजपा पक्षाने जी कोट्यावधीची देणगी जमा केली आहे त्यामध्ये अडीशे कोटी रुपये देणगी गाईचे मांस विकणाऱ्या कंपन्यांकडून जमा केली आहे हे मतदारांनी समजून घ्यावे. एकीकडे गाईला माता म्हणायचे स्वतः गोरक्षक हिंदू धर्म रक्षक म्हणून घ्यायचे आणि त्याच कोट्यावधी गाईंची कत्तल करून मांस विक्री करणाऱ्या कंपन्यांकडून अडीचशे कोटी रुपयांची देणगी या इलेक्ट्रॉल बॉण्डच्या माध्यमातून स्वीकाराय ची हे कुठले हिंदू धर्म प्रेम असा सवाल याप्रसंगी ताम्हणकर यांनी उपस्थित केला.
ते पुढे म्हणाले, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीचे भाजपाचे उमेदवार नारायण रावराणे मागील सुमारे 30 ते 35 वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्व सत्ता केंद्रांच्या प्रमुख स्थानी आहेत.जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा सर्व स्थानिक स्वराज्य संस्था या ठिकाणी सर्वात जास्त कार्य काय नारायण राणे यांची सत्ताजिल्हा परिषद पंचायत समिती किंवा सर्व स्थानिक स्वराज्य संस्था या ठिकाणी सर्वात जास्त कार्यकारणी यांची सत्ता राहिली हे तसेच मागील अडीच वर्षे देशाची महत्त्वाचे मंत्रिपद नारायण राणे यांच्याकडे होते.70 हजार कोटी बजेट असणाऱ्या खात्याचे केंद्रीय मंत्री असतानाही त्यामानाने नारायण राणे यांना आपल्या जिल्ह्यासाठी कोणताही विकास साधता आला नाही असे मत ताम्हणकर यांनी यावेळी व्यक्त केले.
काल फोंडाघाट याठिकाणी झालेल्या प्रचार सभेला शिवसेना उबाठा,इंडिया आघाडी चे प्रमुख पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्ते व मतदार उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार प्रदर्शन राजू राणे यांनी केले