कुडाळ,दि.२९ एप्रिल
कुडाळ गांधी चौक नार्वेकर बेकरी ते बाजारपेठ या मार्गावरून होणारी एक दिशा मार्गाची वाहतूक निर्णय झाला आहे. याचे फलक देखील कुडाळ नगरपंचायतीमार्फत लावलेले आहेत. परंतु, कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी होताना दिसत नाही. परिणामी, सतत वाहतूक कोंडीच्या समस्येला व्यापारी आणि वाहनचालकांना सामोरे जावे लागत आहे.
सध्या एप्रिल महिना सुरू असून उष्म्याने प्रमाण खूपच वाढले आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने कडक उन्हाचा त्रास जनतेला होत आहे. या भागात वाहतूक कोंडी झाले की, बराच वेळ वाहने उभी ठेवून कोंडी संपण्याची होण्याची वाट वाहनधारक बघत असतात. त्यामुळे त्या वाहनधारकांना उन्हाचा नाहक त्रास सहन करावा लागतो. तसेच वाहतूक कोंडी झाल्यामुळे बऱ्याच वेळा त्यातून पादचाऱ्यांना वाट काढून चालणे कठीण होत आहे. त्या सुद्धा उन्हाचा त्रास होत आहे. तसेच तेथील व्यवसायावर सुद्धा परिणाम होत आहे. याचा संपूर्ण विचार करून नार्वेकर बेकरी ते बाजारपेठ या मार्गावरील एकदिशा मार्गाची अंमलबजावणी
तत्काळ करावी. अन्यथा मतदानावर बहिष्कार घालावा लागेल. याचीही नोंद घेऊन पुढील कार्यवाही करावी असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते तथा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय भोगटे यांनी नगरपंचायतीला निवेदन देत लक्ष वेधले आहे.