सावंतवाडी दि.३० एप्रिल
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे सहा हजार तरूण ड्रायव्हर म्हणून गोवा राज्यात काम करत आहेत. त्यांना गोवा राज्याचे लायसन्स काढण्यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सक्ती केली आहे तसे झाल्यास गोवा राज्याला पाणी पुरवठा करणाऱ्या तिलारी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्पाचे पाणी अडवून नाकाबंदी करण्याचा इशारा इंडिया महाविकास आघाडीचे ठाकरे शिवसेनेचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांनी दिला आहे.
इंडिया महाविकास आघाडीचे ठाकरे शिवसेनेचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ माडखोल येथे आयोजित सभेत उमेदवार विनायक राऊत, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, शेतकरी संघटनेचे नेते वसंत उर्फ अण्णा केसरकर, जिल्हाप्रमुख संजय पडते,काँग्रेस नेते विकास सावंत, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर,शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण महिला अध्यक्षा सौ अर्चना घारे,अँड दिलीप नार्वेकर, आप चे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हाणकर, जिल्हा महिला संघटक जान्हवी सावंत, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, विधानसभा संपर्क प्रमुख शैलेश परब,ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, जिल्हा समन्वयक बाळा गावडे,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, संजय लाड, काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, काँग्रेसच्या सौ विभावरी सुकी, संदीप कदम , चंद्रकांत कासार, मायकल डिसोझा, शब्बीर मणीयार, बाळू माळकर, रुची राऊत आदी उपस्थित होते.
उमेदवार खासदार विनायक राऊत म्हणाले, दिपक केसरकर आणि नारायण राणे यांची युती झाली. सहा महिन्यांपर्यंत विळा भोपळा जोडी. एकमेकांना ढुंकूनही पाहत नव्हते ते एकत्रित आले. एकत्रित आले ते वाईट वाटले नाही. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे,शरद पवार, राहुल गांधी यांच्या द्वेषातून तुम्ही एकत्रित येत आहेत हे दुर्दैव आहे. दिपक केसरकर यांना मंत्रीपद दिले होते. पण आता सत्तेसाठी गद्दारी केली.
राऊत म्हणाले,नारायण राणे यांनी मंत्री, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री भूषविले.मी प्रकल्पाच्या नावाखाली जमीन हडप केली नाही. राणे यांनी सर्व प्रकल्प स्वतः साठी केले.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४२ हजार हेक्टर क्षेत्र वनसंज्ञेखाली लावले. केसरकर मिठी मारत आहेत. तुम्हाला पण निवृत्ती देण्याची वेळ आली आहे. दहा वर्ष मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल दिपक केसरकर यांनी होवू दिले नाही. नारायण राणे व दिपक केसरकर यांनी मंत्रीपद असूनही फक्त घोषणा केल्या. द्राक्ष आधारित काजू बोंडे वाईन करण्याची मागणी केली. मात्र दिपक केसरकर यांनी बोंडू प्रक्रिया मशीन दिले मात्र पोलिसांनी कारवाईची आखणी केली. काजू बी ला हमीभाव मिळावा म्हणून मागणी केली पण केसरकर आणि भाजपने फसविले. प्रचंड महागाई वाढली मात्र काजू ला भाव नाही. भाजपचे दलाल इकडच्या जमिनी दिल्ली आणि हरियाणा वाल्यांना विकून टाकत आहेत. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड व पालघर येथे सिडको प्राधिकरण स्थापन करून कोकण भकास करायचं आहे.
राऊत म्हणाले,मराठी माणसाचे प्राबल्य असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडून मुंबई गुजरातला जोडण्याचा प्रयत्न हाणून पाडले पाहिजे.
माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले म्हणाले, मतदारसंघात वातावरण बदलत आहे. नारायण राणे यांचा पराभव निश्चित झाला आहे असे वातावरण निर्माण झाले आहे. मोदी सरकारने प्रचंड महागाई केली. या महागाईच्या वणव्यात लोक होरपळत आहे. तो महागाईचा भस्मासुर नष्ट होईल. श्रीरामाच्या नावाने राजकारण करत आहे.
माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर म्हणाले,मुगेंरी लाल की हसीना स्वप्न दाखवणारे दिपक केसरकर कितीही दिली तरी समाधान नाही. स्वप्न विकणारे जादूगार केसरकर .नारायण राणे कोकणचे वाघ म्हणुन दिपक केसरकर सांगत आहेत मग १५ वर्ष राणे यांच्या विरोधात काय बोलत होता हे जनता विसरले नाहीत.
सौ विभावरी सुकी म्हणाल्या,काँग्रेसने पाच न्याय योजना निवडणूक जाहीरनाम्यात आणलं आहे. बेरोजगार, शेतकरी न्याय योजना, शेती उत्पादन मालाला भाव नाही. जीएसटी मुळे शेतकरी भरडला गेला आहे.
आप चे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हाणकर, ठाकरे शिवसेना जिल्हा संघटक जान्हवी सावंत, काँग्रेस नेते विकास सावंत, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण महिला अध्यक्षा सौ अर्चना घारे विचार मांडले.
यावेळी शाखाप्रमुख सुबोध राऊळ, संतोष राऊळ,विजय राऊळ, पुरूषोत्तम राऊळ, दिलीप राऊळ, सुरेश शिर्के, रमाकांत राऊळ, स्वप्नील लातये, वासुदेव होडावडेकर व मान्यवर उपस्थित होते. यावेळी पक्षप्रवेश करणाऱ्यांचे स्वागत विनायक राऊत यांनी केलं.