वेंगुर्ला, दि.१ मे
सिधुदुर्ग जिल्ह्याच्या नकाशात काही गावांची नावेच गायब झाली तर किल्ल्यांबाबत माहिती अपूर्ण असल्याबाबत जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.संजिव लिगवत यांनी निवेदनाद्वारे जिल्हा माहिती कार्यालयाचे लक्ष वेधले आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा माहिती कार्यालयाचे संदिप राठोड यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेल्या निवेदनात जिल्ह्यात जवळपास ३५ किल्ले असून असंख्य समुद्र किनारे आहेत. पण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विभागातर्फे प्रकाशित करण्यात येणा-या पर्यटन पुस्तिकेमध्ये अतिशय कमी किल्ल्यांचा उल्लेख असून माहितीही अत्यंत कमी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात जवळपास ७५० गाव असून प्रत्येक गावाला वैशिष्ट्यपूर्ण पार्श्वभूमी, नैसर्गिक सौंदर्य व ऐतिहासिक वास्तू, लेणी, गुहा आहेत. पण पर्यटन नकाशावर त्यापैकी काही गावांचा उल्लेख पण नाही आहे. पर्यटन जिल्हा म्हणून सिधुदुर्ग जिल्हा घोषित होऊन २५ वर्षांनंतर ही परिस्थिती असेल तर ती खरोखरच लाजिरवाणी गोष्टअसल्याचे डॉ.लिगवत यांनी म्हटले आहे.
फोटोओळी – गावांची नावे गायब व किल्ल्यांच्या अपूर्ण माहितीबाबत डॉ.लिगवत यांनी जिल्हा माहिती कार्यालयात निवेदन सुपूर्द केले आहे.
