सावंतवाडी दि.१ मे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेने ३० ते ३५ वर्ष एक हाती नारायण राणे यांना नेतृत्व करण्याची संधी दिली. तुम्ही सांगाल ते धोरण आणि बांधाल ते तोरण असे जनतेने त्यांना भरभरून प्रेम दिले आणि त्यांनी मुख्यमंत्री , केंद्रीय मंत्री, कॅबिनेट मंत्री, विरोधीपक्षनेते अशी सत्तापदे भोगली. पण या बदल्या त्यांनी जनतेला काय दिले ? असा प्रश्न काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी उपस्थित केला. रोजगार, आरोग्य या बाबतीत जनता त्रस्त आहे त्यामुळे विनायक राऊत यांचा विजय निश्चित झाला आहे असे त्यांनी सांगितले.
काँग्रेसने इंडिया आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांना पाठिंबा दिला असून त्यांच्या प्रचारात आघाडी घेतली असल्याचे
जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख व जिल्हा उपाध्यक्ष अँड दिलीप नार्वेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
शेख म्हणाले, राणे यांना एक हती जिल्ह्याचे नेतृत्व देऊनही तीस-पस्तीस वर्षात आरोग्य, रोजगार अशा कोणत्याही प्रश्नावर ते लोकांना न्याय देऊ शकले नाहीत .आज रोजगारासाठी गोव्यात जावे लागत आहे तर आरोग्य उपचार करणारी यंत्रणाही नाही. मात्र खासदार विनायक राऊत हे खासदार होते ते मंत्री झालेले नाहीत खासदार असूनही त्यांनी योग्य प्रकारे काम केले आहे तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय देखील आणले आहे ही जमेची बाजू असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले. त्यांना संसद पटू हा सन्मानही मिळाला आहे त्यामुळे त्यांचे काम चांगले आहे हे उघड असल्याचे त्यांनी सांगितले.
काँग्रेसने जाहीरनाम्यात पाच न्याय योजना दिल्या असून या न्यायिक योजना वर पंतप्रधान चुकीच्या पद्धतीने टीका करत आहेत जाहीरनाम्यात पाच न्याय योजना दिल्या आहेत आणि यापूर्वी कर्नाटक, तेलंगणा, हिमाचल प्रदेश आदी ठिकाणी काँग्रेसने जाहीरनाम्यात दिलेल्या योगदानाची अंमलबजावणी केली आहे, त्यामुळे पंतप्रधान जनतेची दिशाभूल करत आहेत असे इर्शाद शेख यांनी सांगितले.
जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यास काँग्रेस सक्षम आहे त्यामुळे काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर दहा वर्षात कुचकामी ठेरलेल्या पंतप्रधानांनी टीका करण्यास सुरू केली आहे ते घाबरलेले आहेत त्यांनी अच्छे दिनाची लोकांना स्वप्न दाखवली ती पुर्ण करता आली नाहीत.त्यांना काही करून दाखवता आले नाही त्यामुळे पंतप्रधान खोटे पण रेटून बोलत असल्याचे टिका शेख यांनी केली
यावेळी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष अँड दिलीप नार्वेकर म्हणाले, लोकशाही आणि संविधान वाचविण्यासाठी देशभरामध्ये भाजपच्या विरोधात वातावरण असून इंडिया आघाडीचा विजय होईल. सर्वोच्च न्यायालयाने मतदारांना यापूर्वी कधी आवाहन केल्याचे ऐकिवात नाही. प्रथमच निर्भय वातावरणात मतदान करण्याचे आव्हान केलेले आपल्याला दिसून येत आहे त्यामुळे जनतेने ओळखले पाहिजे. इलेक्ट्रॉल बाॅड बाबत पैसे गोळा करण्याचा खंडणीचा प्रकार असल्याचे अप्रत्यक्ष शिका मोर्तब केले आहे असे त्यांनी सांगितले
दिलीप नार्वेकर पुढे म्हणाले ,नारायण राणे आणि दीपक केसरकर हे कुचकामी ठरले आहेत ते फक्त आश्वासन आणि घोषणा देत आहेत. दीपक केसरकर, राणे हे दोन्ही कॅबिनेट मंत्री असूनही त्यांनी एखादा कारखाना आणला आणि तिथे ५०० तरुणांना रोजगार मिळाला असा रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकही दाखला देता येणार नाही ते कुचकामी ठरलेले आहेत .सावंतवाडी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल बाबत केसरकर लोकांची दिशाभूल करत आहेत त्यांना ते करायचे नाही. मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल करायचे असेल तर सांगावे .मी चार ते पाच एकर जागा सावंतवाडी द्यायला तयार आहे त्यांनी ती जागा घ्यावी आणि मल्टीस्पेशालिटी सुरू करावे अशी रोखठोक आव्हान देखील नार्वेकर यांनी केसरकर यांना दिले.
यावेळी जिल्हा युवक अध्यक्ष किरण टेबुलकर,सावंतवाडी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र सांगेलकर, विभावरी सुकी, माया चिटणीस,अँड संभाजी सावंत, अँड राघवेंद्र नार्वेकर, सुमेधा सावंत,संदीप सुकी , श्री नंदीहल्ली, कौस्तुभ पेडणेकर,तसेच पदाधिकारी उपस्थित होते.
