लोकसभा निवडणूक मतदान झाल्यावरआचारसंहिता शिथिल झाली नाही तर विकासाचा खेळ खंडोबा होणार?

सावंतवाडी दि.१ मे
रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर आचारसंहिता शिथिल झाली नाही तर विकासाचा खेळ खंडोबा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पावसाळा तोंडावर असल्याने आचारसंहिता मतदानानंतर शिथिल झाली पाहिजे अशी मागणी करण्यात येत आहे.लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता, तोंडावर असणारा पावसाळा आणि पावसाळ्यानंतर विधानसभा निवडणुक आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे त्यामुळे एक वर्षभर विकासाच्या नावाखाली खेळ खंडोबा होणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळात झटपट निर्णय झाले होते तसेच कोट्यवधी रुपयांच्या कामांना वर्क ऑर्डर दिली होती. मात्र आचारसंहितेमुळे ही कामे सुरू झाली नाहीत. ज्या कामावर ठेकेदाराने साहित्य टाकले होते. ती कामे सुरू आहेत असे अहवाल सादर करण्यात आले. मात्र अनेक कामावर ठेकेदाराने साहित्य टाकले नसल्याने वर्क ऑर्डर देऊनही कामे हाती घेतली नाहीत.
पावसाळा तोंडावर आला आहे तसेच लोकसभा निवडणुक आचारसंहिता, पावसानंतर विधानसभा निवडणुक जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आचारसंहितेत विकासाच्या नावाखाली खेळ खंडोबा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूक मतदान होताच रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघांची आचारसंहिता शिथिल करण्याची मागणी केली जात आहे.