सावंतवाडी दि.२ मे
कोकणच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास आणि श्वास केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या ह्दयात आहे. तो करण्यासाठी ते अहोरात्र मेहनत घेत आले आहेत. महिलांची संख्या मतदारसंघात जास्त आहे. तुमच्या मतांवर कोकणचा विकास अवलंबून आहे. प्रत्येकाने विकासासाठी नारायण राणे यांना मत द्यावे असे आवाहन सौ निलमताई नारायण राणे यांनी केले.
भाजप महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ वैश्य भवन येथे आयोजित महिला मेळाव्यात सौ निलमताई नारायण राणे व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर , शिवसेना महिला जिल्हाध्यक्षा अँड निता कविटकर, सौ प्रज्ञा परब, आनारोजीन लोबो, संध्या तेरसे, सौ श्वेता कोरगावकर, अशोक दळवी, मेघना राऊळ, अन्नपूर्णा कोरगावकर, अर्चना पागंम,श्रीमती सौदागर आदी उपस्थित होते.
सौ निलमताई राणे म्हणाल्या, तुम्ही सर्वंच आमचीच माणसे आहात. राणे साहेब ४० वर्ष शिवसेनेत होते. बाळासाहेबावर अतुट प्रेम आहे. राजकीय पटलावर बदल झाले आज भाजपमध्ये आहेत. कोकणचा विकासाचा ध्यास राणे यांच्या हृदयात आहे. नगरसेवक ते केंद्रीय मंत्री पदापर्यंत पोहोचले आहेत मात्र कोकणचा विकास हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतला. महिलांच्या बचत गटांना प्रोत्साहन दिले. माझ्या परिने बचत गटांसाठी मी काम करत आहे. यापुढील काळात बचत गटांना मार्केटिंग व बचत गटाच्या माध्यमातून महिलांचा आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न केला जाईल.
सौ राणे म्हणाल्या,महिलांचे मत निर्णायक आहे. तुमच्या मतांवर कोकणचा विकास अवलंबून आहे. विरोधक उमेदवारांने दहा वर्षांत काय केले हे पहावे.नारायण राणे यांना मत म्हणजे विकासाला मत आहे. हे लक्षात ठेवा.
यावेळी भाजप महिला जिल्हाध्यक्षा सौ श्वेता क़ोरगावकर, माजी नगराध्यक्षा आनारोजीन लोबो, सौ प्रज्ञा परब, शिवसेना महिला जिल्हाध्यक्षा अँड निता कविटकर यांनी नारायण राणे यांना निवडणुकीत विजयी करण्याचे आवाहन केले. सुत्रसंचलन मेघना राऊळ यांनी केले.