अंगणवाडी सेविकांचे एकही मत विरोधी उमेदवाराला पडणार नाही – कमलताई परूळेकर

कणकवलीत इंडिया आघाडीची उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ सभा

कणकवली दि.३ मे(भगवान लोके)

इस बार मोदी हद्दपार.. भाजपच्या उमेदवाराला एकही मत पडणार नाही, याची तजवीज आम्ही अंगणवाडी सेविका संघटनेने केली आहे.गलिच्छ शब्दात मोदी आणि त्यांची मंडळी टीका करीत आहेत,हे बरोबर नाही. हा सिंधुदुर्ग जिल्हा नाथ पै यांचा आहे. मधु दंडवते यांचा आहे .या जिल्ह्यात अभद्र भाषा आणि खून मारामारी शोभणार नाही,अशी टीका सामाजिक कार्यकर्त्या कमलताई परळेकर यांनी केली.

कमलताई परुळेकर म्हणाल्या,मणिपूर जळत होता आजही जळतोय आणि त्या मणिपूरमध्ये महिलांची जी धीड काढली गेली. त्याचे या युतीवाल्यांना काहीही वाटत नाही. तुमच्या घरात जर झुंडशाही आली तर तुम्ही काय करणार आहात ? महिलांबद्दल तिरस्कार असणाऱ्या या मोदींना यापुढे हद्दपार केलं पाहिजे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांनाही
खोके बाज मंत्रिमंडळाने वाढ दिली नाही.

सतीश सावंत म्हणाले, १९९० पासून या जिल्ह्यात असताना गेले ३४ वर्ष राणेंनी जिल्ह्याचा विकास केला असता तर जिल्ह्यातील तरुणांना बेरोजगारांना रोजगार मिळाला असता, जिल्ह्यात बेरोजगारी वाढण्याचे श्रेय नारायण राणे यांना जाते. किसान सन्मान योजना, पक्की घरे तसेच शेतकऱ्यांना कर्जमाफी पासून वंचित ठेवण्याचे काम भाजप सरकारने केले.भाजपचे उमेदवार नारायण राणे यांनी गेल्या २४ वर्षात कोणतेही काम केले नाही.

शिवसेना नेते अतुल रावराणे म्हणाले,विनायक राऊत यांची ही प्रचार सभा नव्हे तर विजयी सभा आहे. ज्या ज्या वेळी उद्धव ठाकरे यांनी या मैदानात सभा घेतल्या. त्यावेळी शिवसेनेचा विजय झाला आहे. राणे यांनी स्वार्थासाठी किती कोलांड्या उड्या मारल्या ,स्वार्थासाठी किती पक्ष बदलले हे कोकणवासीयांना चांगलंच माहित आहे.आजही लोकसभेची उमेदवारी मिळण्यासाठी भारतीय जनता पक्षात शेवटच्या यादीमध्ये धडपड करून कशीतरी स्थान त्यांना मिळवता आलं अशी टीका त्यांनी राणेंवर केली. किरण सामंत सारख्या उद्योजक असलेल्या साध्या व सच्चा भोळ्या मनाच्या तरुणाने राणे यांना उमेदवारीसाठी घाम फोडला.प्रशासनाचा अहवाल आला त्यात राणे कधीच जिंकणार नाही.मोदी आणि योगी यांना माहिती आहे, राणे पडणार आहेत .त्यामुळे कोल्हापुरात ते येऊन गेले पण कोकणात आले नाही .अमित शहानी पहिली तारीख कॅन्सल केली व दुसरी आज परत कशीतरी सभा दिली. त्यांचा सुपुत्र स्टंट बाज आमदाराने गेल्या दहा वर्षात त्यांनी फक्त स्टंटबाजी केली. सगळ्या फसव्या घोषणा या आमदाराने केल्या. राणे यांची राडासंस्कृती गेलेली नाही. त्याला दहशतवादानेच विजय मिळवायचा आहे .आता राणेना सांगतो तुमचा दहशतवाद चालणार नाही. शिवसेनेने तुमचा दहशतवाद संपवला आहे
वैभव नाईक यांनी तुम्हाला धूळ चारली .राणे परिवाराचे पुस्तक आता शिवसेनाच बंद करणार आहे. आपण विजयाची हॅट्रिक साधून राऊत याना तिसऱ्यांदा निवडून देऊया आणि तिसऱ्यांदा पाडून राणेंचे पुस्तक कायमस्वरुपी बंद करुयात.

सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर म्हणाले, ज्या मतदारसंघातून गद्दारी झाली, त्या मतदारसंघातून अर्थात सावंतवाडीतून मी आलेलो आहे. अनेक वेळा स्वार्थासाठी वेगवेगळ्या पक्षात उडी मारणारे दीपक केसरकर. स्वतःच्या स्वार्थासाठी या माणसाने डोक्यावर गद्दारीचा ठपका मारून घेतला, तो कधीही पुसला जाणार नाही. जिल्ह्यातील दहशतवाद संपला हा केसरकर याला साक्षात्कार झाला, शरद पवार यांनी जेव्हा २०१४ मध्ये बैठकीला बोलावलं तेव्हा त्यांनी दहशतवाद्यांच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही असं वक्तव्य केलं आणि आता ते स्वतः दहशतवाद संपला अशी वलग्ना करत आहेत, अशी प्रवृत्ती संपवायची असेल तर इंडिया आघाडीशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले.

कणकवली येथे महाविकास आघाडीचे उमेदवार खा. विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ सभा आयोजित करण्यात आली आहे.या व्यासपीठावर ठाकरे शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत, संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, प्रदीप बोरकर, जान्हवी सावंत, ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, संजय पडते , ठाकरे शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत, अरुण दुधवडकर, प्रदीप बोरकर, जान्हवी सावंत, ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, संजय पडते, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, अतुल रावराणे, आप जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर, काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी, सामाजिक कार्यकर्त्या कमलताई परुळेकर, भाई गोवेकर, ठाकरे शिवसेना महिला आघाडी प्रमुख नीलम पालव, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, प्रवक्ते अरविंद भोसले, संदीप कदम, राष्ट्रवादी शरद पवार गट तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर, राष्ट्रवादी शरद पवार गट कोकण विभागीय अध्यक्षा अर्चना घारे, राष्ट्रवादी शरद पवार गट जिल्हाध्यक्ष अमित सामंत, माजी मंत्री प्रवीण भोसले, गीतेश राऊत, बबन साळगावकर,बाळा गावडे, नागेश मोरये आदींसह इंडिया आघाडीचे पदाधिकारी उपस्थित आहेत.