श्री विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेच्या वतीने उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पाठिंबा

सावंतवाडी दि. ४ मे
श्री विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेच्या वतीने उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पाठिंबा देण्यात आला आहे असे अध्यक्ष मंगेश तळवणेकर यांनी म्हटले आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणें यांनी प्रथम निवडून आल्यापासून कोकणातील गोरगरीब जनतेला वेळोवेळी मदत केलेली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटन जिल्हा घोषीत करुन घेतला, कोकणातील पर्यटन स्थळांचा विकास, रस्त्यांचे रुंदीकरण, नळ योजना सुरु केल्या. ज्यावेळी शासकीय योजनांचा लाभ येथील लोकांना मिळत नव्हता, त्यावेळी कोकणातील गोरगरीबांना गरजूंना, आजारी व्यक्तींना मा.नारायणराव राणे यांनी भरपुर आथिर्क मदत दिली हे मी सर्व जवळून पाहिलेले आहे. मा.नारायण राणे सारखा दुसरा नेता दुरदृष्टी असलेला अभ्यासू नेता पुन्हा जिल्ह्यात होणे कठीण आहे, असे तळवणेकर यांनी म्हटले आहे.

विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेच्या वतीने मा.नारायण राणेंना जाहीर पाठींबा देण्यात आला, त्यावेळी मंगेश तळवणेकर, लक्ष्मण देऊळकर, प्रकाश सावंत, नारायण कारिवडेकर, अजय सावंत, संतोष हरमलकर, भालचंद्र राऊळ, सुधीर नाईक, प्रकाश जाधव, सागर सावंत, भरत गंगावणे, बाळकृष्ण नाईक, संतोष नाईक आदी उपस्थित होते.