भाजपा आम.नितेश राणे यांचे उद्धव ठाकरेंना इशारा ; आम्ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढतो आहे..
कणकवली,दि.४ मे
उद्धव ठाकरे यांनी २००५ विधानसभा निवडणुकीत काय अवस्था झाली होती,ही उद्धव ठाकरे यांना माहीत आहे.सिंधुदुर्गात येऊन विनाकारण वातावरण खराब करु नका. तुम्ही जिल्ह्याच्या जनतेच्या परिवर्तनासाठी काय करणार ? हे आधी सांगा.आम्ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढतो आहे,त्यामुळे नारायण राणे यांना खासदार बनविण्यासाठी तीन दिवस दिवस रात्र कार्यकर्त्यांनी झोपू नका,असे आवाहन कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी केले.
कणकवली येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर ना.दीपक केसरकर,मनसे नेते बाळा नांदगावकर ,नितीन सरदेसाई,अविनाश अभ्यंकर,आमदार नितेश राणे,भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक,शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे,शिरीष सावंत,आनंदराव अडसूळ,काका कुडाळकर,राजू राऊळ,वैभव खेडेकर, मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब,रेश्मा कोरगावकर आदींसह महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित आहेत.
आ.नितेश राणे म्हणाले,शुक्रवारी उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली होती,त्या टीकेचा खरपूस समाचार नितेश राणे यांनी आज शनिवारी महायुतीच्या प्रचार सभेत घेतला.आम. नितेश राणे म्हणाले, आजची ही सभा प्रचाराच्या निमित्ताने होत आहे. मी बाळा नांदगावकर यांना सांगेन काल पण इथे सभा झाली, लग्न समारंभात जास्त गर्दी असते पण काल झालेल्या सभेत छोटीशीच गर्दी होती .उबाठाचे पक्षप्रमुख इथे आले होते. दहा वर्ष मोदी यांच्याकडे बघून इथल्या खासदारांना मतदान केले. खासदारांनी दहा वर्षे काय केलं हे सांगण्यापेक्षा शिव्या शाप देण्याच्या पलीकडे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काहीच केलं नाही. काल उद्धव ठाकरे फार पचपच पचपच करून गेले. उत्तर देण्यासाठी आम्ही नंतर सभा घेऊ .जे काय बोलले आहे ते सर्व परतफेड ४ जूनला करूच. बाळासाहेब ठाकरे यांचे आमच्यावर संस्कार आहेत.अंगावर आलं तर शिंगावर घ्या, असं त्यांनी सांगितलं आम्ही सोडणार नाही. ना.नारायण राणे गाढण्याची भाषा केली, ज्याला काही करता येत नाही ते आम्हाला गाढण्याची भाषा करतात. 2005 ची निवडणूक लक्षात घ्या, उद्धव ठाकरे यांना कसं पळवून लावलं ते. पुन्हा करायचं असेल तर पुन्हा या, त्याची आठवण आम्ही करून देऊ, मात्र ही निवडणूक आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढवत आहोत. निष्क्रिय खासदार म्हणून खासदार विनायक राऊत यांच्यावर राणे यांनी टीका केली.या मतदार संघातील एक तरी प्रश्न सोडवला का याची या खासदारांनी थोडी तरी माहिती द्यावी.
बीएसएनएलचा प्रश्न असो, रस्त्याचा प्रश्न असो, दहा वर्षात किती प्रश्न सोडवले ?विनायक राऊत यांच्यासारख्या प्राण्याने एकही प्रक्ष सोडवला नाही. मोदी- फडणवीस यांच्यावर टीका करण्यापेक्षा काहीच केलं नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खासदारांनी आपल्या काय केलं हे सांगितलं पाहिजे होतं. सिंधुदुर्गात पेंग्विन पाहायला मिळणार आहे म्याऊ म्याऊ करायला आला आहे. हा कुठल्या आवाजाने बाळासाहेबांचा नातू वाटतो हा संशोधनाचा विषय आहे. चायनीज मॉडल अशी आदित्य ठाकरे यांची संभावना राणे यांनी केली. पर्यटन मंत्री म्हणून पर्यटन प्रकल्पाकडे त्यावेळी आदित्य ठाकरे यांनी लक्ष दिले नाही असा आरोप केला .तुमचे पाप आमच्यावर टाकू नका तुम्ही काय करता ते सांगा. राम मंदिराच्या निर्माणासाठी स्वयंसेवकांनी हिंदू समाजाने उस्फुर्त काम केले मात्र आमदार वैभव नाईक यांनी हिंदू समाजाचा अपमान केला. नेत्यांना खुश करण्यासाठी आमदार वैभव नाईक करत असतील तर त्याला चोख उत्तर द्या असे आवाहन केले.कार्यकर्त्यांनी मतदारापर्यंत पोहोचावे व ७ मे रोजी कमळ चिन्हावर मतदान करून नारायण राणे यांना निवडून द्या, असे आवाहन त्यांनी केले.
मनसेचे सरचिटणीस मनोज चव्हाण म्हणाले, राज ठाकरे यांची मनसेच बिनशर्त युती करू शकते. विनायक राऊत यांना कायमस्वरूपी घरी बसवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रचारात उतरली आहे .नारायण राणे म्हणजे कामाची एक वेगळी मशीनच आहे. महाराष्ट्रात ऐतिहासिक विजय नारायण राणे यांना निवडून देण्यासाठी आपण सज्ज होऊया आणि विजयी मेळावा घेऊया .