जनतेला आत्मनिर्भर करण्याचे काम मोदी सरकारने केले

भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत ;कणकवलीत राज ठाकरे यांना ऐकण्यासाठी तुफान गर्दी…

कणकवली दि.४ मे(भगवान लोके)

लोकसभा निवडणूक ही महत्त्वाची आहे. या देशाला वेगळा आयाम देणारी आहे. ही निवडणूक संपूर्ण राष्ट्राला जिंकवणारी निवडणूक आहे. या दृष्टीने या निवडणुकीकडे बघितलं पाहिजे. भारताची प्रतिमा जगभरात उंचावण्यासाठी जे काही प्रयत्न नरेंद्र मोदींनी चालवले आहे, ते सर्वांना माहीतच आहे. मोदींनी जनतेसाठी घेतलेले निर्णय राबवलेल्या योजना दुरगामी परिणाम करणारे आहेत. पंतप्रधान आवास योजनेतून देशभरात घरे दिली. ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणेचा झाळे उभे राहिले आहे. जनतेला आत्मनिर्भर करण्याचे काम मोदी सरकारने केले आहे.त्यामुळे नारायण राणे यांना ४०० खासदारांमध्ये निवडून दिले पाहिजे,असे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केले.

कणकवली येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर मनसे नेते बाळा नांदगावकर ,नितीन सरदेसाई,अविनाश अभ्यंकर,आमदार नितेश राणे,भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक,शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे,शिरीष सावंत,आनंदराव अडसूळ,काका कुडाळकर,राजू राऊळ,वैभव खेडेकर, मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब,रेश्मा कोरगावकर आदींसह महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित आहेत.

प्रभाकर सावंत म्हणाले,आपल्याला संकुचित वृत्तीचा विरोधी पक्ष लाभला आहे. त्यामुळे सर्व मतदारांनी चांगला विचार करून नारायण राणे निवडून द्यावे असे आवाहन करीत राणेंच्या कार्याचा आढावा घेतला.

शिवसेना नेते आनंदराव अडसूळ म्हणाले, पंतप्रधान मोदींनी देशांमध्ये जो विकास केला, त्याची पाळेमुळे महाराष्ट्रातील ग्रामीण भागात पसरली. शेतकऱ्यांसाठी सन्मान योजना दिली. जात, धर्म, पक्ष, पंत काही पाहिलं जात नाही .या सर्व गोष्टी आम्ही अनुभवतोय. प्रत्येक माणसापर्यंत आणि घरापर्यंत विकास पोचवला आहे अशा अनेक गोष्टी आपल्याला बघायला मिळतील. कुटुंबाचा विकास करण्यासाठी विविध योजना राबविल्या.40 कोटी जनतेमधून 25 कोटी जनता दारिद्र्य रेषेखालून वर आली आहे. हे सरकार आपल्याला हव आहे हे लक्षात घ्या. नारायण राणे म्हणजे अभ्यासू नेता आणि सर्वसामान्यांची जाण असलेल्या नेता अशा शब्दात त्यांनी राणे यांचे कौतुक केले.सर्वांनी राणे यांना अनुभवले आहे ते दुसऱ्यांदा लोकसभेत जाण्यासाठी तयारीत आहेत. जनतेचे प्रश्न कसे मार्गी लावावे हे ध्येय घेऊन ही काम करणारी मंडळी आहे. त्यामुळे राणे यांच्यासारखी व्यक्ती दिल्लीच्या लोकसभेत जायला हवी अशी अपेक्षा अडसूळ यांनी व्यक्त केली. नारायण राणे शिवाय इथे पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक म्हणाले, झाराप ते राजापूरपर्यंत हायवे झाला तो नारायण राणे यांच्यामुळेच झाला. विद्यमान खास. विनायक राऊत यांनी दहा वर्षात काय केलं? संविधान बदलले जाणार असे विनाकारण सांगितले जात आहे. कणकवली नगरपंचायतमध्ये आम.नितेश राणे यांच्यामुळे कोट्यावधीचा निधी आणला . कणकवली शहराची रॅली निघाली त्यामुळे विरोधकात धडकी भरली . महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना सिंधुदूर्ग जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात मताधिक्य दिले जाणार आहे. नारायण राणे यांनी जनतेसाठी काम केले आहे. मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी जो निर्णय घेतला हा दुग्ध शर्करा योग असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या कामाचा अबिद नाईक यांनी आढावा घेतला .खा. विनायक राऊत यांनी दहा वर्षात खासदार असताना काय काम केले? असा सवाल केला. विरोधकांनी सुद्धा राणे यांना मतदान करण्याचा निर्धार केला आहे,असे ते म्हणाले.