गेल्या दहा वर्षांत बेरोजगारी वाढली, प्रचंड महागाई वाढली त्याला केंद्रातील भाजप सरकार आणि खोके सरकार जबाबदार-युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे
सावंतवाडी दि.४ मे
देशभरात भाजपची पिछेहाट होत आहे. तशीच महाराष्ट्रही होईल. महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल तसेच भाजप दोनशे जागांवर समाधान मानावे लागेल असा विश्वास युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. गेल्या दहा वर्षांत बेरोजगारी वाढली, प्रचंड महागाई वाढली त्याला केंद्रातील भाजप सरकार आणि खोके सरकार जबाबदार आहे. त्यांना मतदान म्हणजे महागाईला मतदान करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
इंडिया महाविकास आघाडीचे ठाकरे शिवसेनेचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत गांधी चौकात आयोजित सभेत उमेदवार खासदार विनायक राऊत, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, आमदार वैभव नाईक,वसंत उर्फ अण्णा केसरकर, विकास सावंत,अरुण दुधवडकर, बबन साळगावकर, संदेश पारकर,गौरीशंकर खोत, अतुल रावराणे,विवेक ताम्हाणकर, जान्हवी सावंत,इर्शाद शेख, अँड दिलीप नार्वेकर, अर्चना घारे, कमलताई परूळेकर, प्रियांका जोशी,साक्षी वंजारी, संजय पडते,शैलेश परब, रुपेश राऊळ, रमेश गावकर, बाबुराव धुरी,किशोर जाधव,बाळा गावडे, चंद्रकांत कासार, मायकल डिसोझा,समिर वंजारी, अँड राघवेंद्र नार्वेकर, शब्बीर मणीयार, महेंद्र सांगेलकर,अशोक परब, बाळु माळकर,सागर नाणोसकर,अँड कौस्तुभ गावडे आदी उपस्थित होते.
युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे म्हणाले, मुंबई गोवा महामार्ग १४ वर्ष झाली पण पुर्ण होत नाही. भाजपचे ठेकेदारांनी कामे रखडवून ठेवले. पंधरा लाख कोणाच्या खात्यात आले का? शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले नाही. भाजप अबकी बार ४०० पार म्हणत आहेत. उलट अबकी बार भाजप तडीपार होणार आहेत. देशभरात भाजपचे दोनशे जागा येत नाहीत. दक्षिण भारतात भाजप ला मतदान होणार नाही. उत्तर, दक्षिण भारतात भाजपला अपयश येत आहे. हुकुमशाही नको, लोकशाही हवी म्हणून सर्व राज्यांत आवाज उठवला जात आहे.
आदीत्य ठाकरे म्हणाले, ३७० कलम काढले तर काश्मीर, लडाख मध्ये भाजपाची स्थिती वाईट आहे. परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत त्यामुळे भाजप चे कुठेच कार्ड चालत नाही. लोकशाही व संविधान वाचविण्यासाठी इंडिया आघाडी एकत्रित आले आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला बहुमत मिळणार आहे भाजप ला संविधान बदलणार आहे. देशभक्ती साठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान आहे. मराठा, धनगर समाज सर्वांना आरक्षण हवे आहे. भाजप ला आरक्षण द्यायचे नाही.
ठाकरे म्हणाले, महाराष्ट्र राज्यात अन्याय होत आहे. देशात कोणालाही एकत्र बसवत आहे. जनतेला, महाराष्ट्रला द्यायचे नाही. वेदांत फाॅक्सकाॅन गुजरातला नेला तेव्हा मी नेडलो. राज्यातून भाजप सरकारने अनेक प्रकल्प नेले. गुजरात राज्य किंवा गुजराती जनतेशी माझं भांडण नाही. माझं भांडण केंद्र सरकारशी आहे. उद्या भाजप सरकार आले तर मंत्रालय गुजरात ला नेतील . भाजप सरकार खोटं बोलत आहे. शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नाही असे शेतकरी सांगतात. खोके सरकार,मिंधे सरकारने शेतकऱ्यांना दिलासा दिला नाही.
ठाकरे म्हणाले, भाजप सरकारने अन्नदाता वर लाठीचार्ज, अश्रूधुर सोडला त्यांना मत देणार काय? आम्ही अडीच वर्षात चांगले प्रकल्प गुजरात ला तर रिफायनरी सारखे राखरांगोळी करणारे प्रकल्प कोकणात आणतात. खोके सरकारने तलाठी भरती, पोलिस भरती मध्ये तरुण उदास झाला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून जनता पाठिंबा देत आहे. कर्नाटक राज्यातील खासदार रेवण्णा यांनी महिलांच्या वर अत्याचार केले. भाजप ने त्याला जर्मनी मध्ये पाठविले. महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात दोन मंत्री खोके खाऊन महिलांवर अत्याचार केला ते मंत्री मांडीला मांडी लावून बसले आहेत. बलात्कारऱ्याना भाजप संरक्षण करताहेत त्यांना मतदान करणार का? भाजपला धडा शिकवला पाहिजे.
ठाकरे म्हणाले, गेल्या दहा वर्षांत बेरोजगारी वाढली. गॅस, पेट्रोल, डिझेल दरवाढ झाली. प्रचंड महागाई झाली. जगणं परवडत नाही. प्रत्येक पेट्रोल पंपावर फोटो मात्र यांचे आहेत. जुमल्याचे नाव गॅरंटी केले. अडीच वर्षात महाविकास आघाडीचे काम केले. पण खोके सरकारने काही केले नाही. असली सेना, नकली सेना कोण आहे ते ईडी, सीबीआय बाजूला ठेवून या तुम्हाला जनता दाखवेल. त्यांना बोलण्यासाठी पैसे मिळतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला त्रास देणाऱ्यांना संधी देणार का? विनायक राऊत यांनी दहा वर्षांत शांततेत विकास केली. पाणबुडी, पर्यटन विकास कामे मी केली. मात्र आमचं सरकार गेले. जमिनी लुटणाऱ्याना, चिंधी चोरांना संधी देणार का? विनायक राऊत यांनी मतदारसंघात २४ तास कोकणाचा, जनतेचा विचार करून गावोगावी मशाल पोहचवा आणि विनायक राऊत यांना दिल्लीत पाठवा.
इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत म्हणाले, सावंतवाडी मध्ये अभद्र युती झाली आहे. नारायण राणे यांची दिपक केसरकर यांनी दहशत संपवली. सांगत होते. बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी करणारे संपले आहेत. आदीत्य ठाकरे पर्यटन मंत्री असताना सिंधुदुर्ग जिल्हा विकासासाठी निधी मंजूर केला. सिंधुदुर्ग जिल्हात दबंगगिरी केली. गेल्या ३५ वर्षात हैदोस घातला ती जनता विसरली नाही. वेंगुर्ले राडेबाजी सुरू होण्याची भीती आहे. शहरातील शिवसेनेचे झेंडे उतरायला दिपक केसरकर यांनी लावले उध्दव ठाकरे आणि शरद पवार यांनी तुम्हाला राज्यात ओळख करून दिली त्यांच्याबाबत सुरू असलेल्या षडयंत्राला लोक मतातून उत्तर देतील. काजू आंबा बागायतदारांचे प्रश्न संसदेत उमटविला. दिपकभाई तुम्ही नारायण राणे यांची तळी उचलता त्यांनी स्वतः चा विकास केला. या ठिकाणी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू व्हायला तयार नाही.पण उध्दव ठाकरे यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करून आर्थिक तरतूद केली आता तिसऱ्या टर्म विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सिंधुदुर्ग जिल्हात मोठ्या प्रमाणात मायनिंग,बाॅक्साईट प्रकल्प नारायण राणे व दिपक केसरकर यांना करायचे आहे. मात्र मायनिंग प्रकल्पाला विरोध राहील. सिंधुदुर्ग जिल्हाची भूमी परप्रांतीयांच्या घशात घालण्याचा निर्णय घेतला.सिडकोच्या ताब्यात जमीन देण्याचा निर्णय घेतला. सिडकोचे अतिक्रमण गाढुन टाकणार आहोत.
आमदार वैभव नाईक म्हणाले, दिपक केसरकर यांना शिवसेनेने सर्व काही दिले तरीही त्यांनी गद्दारी केली. सातत्याने लोकांना फसविले. मोदी गॅरंटी ची जाहिरात केली जात आहे. मात्र ती फसवी आहे. भेडशी मध्ये ए, बी व सी यादी करून मतदारांना एक, दोन व तीन हजार रुपये देत आहेत. भाजप विरुद्ध लढताना जनतेने साथ द्यायला हवी. बॅरिस्टर नाथ पै व प्रा मधू दंडवते यांचे आदर्श आहेत,ती विनायक राऊत यांना प्रचंड मतांनी विजयी करा. व्हॅनिटी व्हॅन खोक्यातून आली कि कोठून आली ते कळले पाहिजे.
माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, मोदी सरकारने जनतेला महागाई च्या खाईत लोटले आहे. जीएसटी मुळे जनता मेटाकुटीला आले असून शेतकऱ्यांना देखील सोडले नाही. शेतकरी, महिला, विद्यार्थी व आम जनता महागाईच्या वणव्यात होरपळून गेली आहे.
सौ जान्हवी सावंत म्हणाले, दिपक केसरकर म्हणतात, नारायण राणे जेथे जातात तेथे सत्ता जाते. त्यामुळे तुम्ही पक्ष बदलू आहात तुम्ही आता कमळ हातात घेतले तर आश्चर्य वाटायला नको.
उपनेते गौरीशंकर खोत म्हणाले, महागाई वाढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला फसविले. मोदी खोटं बोलत आहेत.
यावेळी कमलताई परूळेकर, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, आप चे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हाणकर, काँग्रेस नेते विकास सावंत, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख आदींनी मार्गदर्शन केले.