मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आवाहन ; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ सभेला उसळला जनसमुदाय
कणकवली दि.४ मे(भगवान लोके)
पाडव्याला माहायुतीला पाठिंबा जाहीर केला, तेव्हा फारसं माहिती नव्हतं पुढे सभा घ्यावी लागतील.माझे मिञ नारायण राणे यांचा फोन आल्यावर मी त्यांना नाही म्हणू शकत नाही. कारण मी मैत्री संबंध सांभाळणारा माणूस आहे. खरंतर नारायण राणे यांना प्रचार सभेची आणि माझी आवश्यकताच नाही ते निवडून आलेलेच आहेत, कोकणातला केंद्रात मंत्री होणारा खासदार म्हणून नारायण राणेंना मतदान करा,असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले.
कणकवली येथे माहायुतीच्या जाहीर सभेत ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर केंद्रीय मंत्री नारायण राणे,ना.दीपक केसरकर,मनसे नेते बाळा नांदगावकर ,नितीन सरदेसाई,अविनाश अभ्यंकर,आमदार नितेश राणे,भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक,शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे,शिरीष सावंत,आनंदराव अडसूळ,काका कुडाळकर,राजू राऊळ,वैभव खेडेकर, मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब,रेश्मा कोरगावकर आदींसह महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित आहेत.
राज ठाकरे म्हणाले, हा इतका देखना असा प्रदेश आहे आणि सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीची जनता सुजान आहे. साधी गोष्ट बघा सुजाण अशा अर्थाने बोलतो ९ भारतरत्न आहेत. त्या ९ भारतरत्नंपैकी ७ भारतरत्न एकट्या कोकणामधील आहेत. लता मंगेशकर ,विनोबा भावे, सचिन तेंडुलकर, भीमसेन जोशी, बाबासाहेब आंबेडकर त्यात विशेष म्हणजे चार भारतरत्न हे एकट्या दापोलीतील आहेत आणि म्हणून मी म्हटलं सुजान..! असा हा मतदारसंघ आहे. या वेळेला मी ठरवलं होत मुलाखती फारशा कोणाला द्यायचे नाहीत. मुलाखती द्यायच्या त्या विधानसभेला . त्यामुळे फारसे कोणी पत्रकार माझ्याजवळ आले नाहीत पण पाठिंबा जाहीर केल्यावर ही माझी पहिली जाहीर सभा आणि मग मी पाठिंबा का जाहीर केला कशासाठी जाहीर केला, हे मागील सभेत सांगितलं होतं .मी तुम्हाला गोष्ट सांगतो ..मी एक सरळ चालणारा मनुष्य आहे. मला एखादी गोष्ट पटली तर पटली आणि पटली नाही तर शेवटपर्यंत नाही पटणार. तसं 2014 ते 2019 च्या दरम्यान ज्या गोष्टी केंद्र सरकारकडून झाल्या ,मोदींकडून झाल्या, त्या मला नाही पटल्या त्यांना मी जाहीर विरोध केला. काही गोष्टी नाही पटल्या, ज्या आजही मला पटत नाहीत या गोष्टीत आपण मोकळ असणं गरजेचं आहे .नोटाबंदी, पुतळ्यांची गोष्ट असेल अनेक गोष्टी असतील ज्या गोष्टी नाही पटल्या त्यांना विरोध केला. ज्या गोष्टी पटल्या त्याचं जाहीर कौतुक करणारा देखील माणूस मी आहे. 370 कलम काश्मीरमध्ये रद्द झालं. किती वर्ष ऐकतोय मी जेव्हापासून माझा राजकारणाशी संबंध आला तेव्हापासून ऐकतोय. 75 चा आणीबाणीचा काळ असेल तेव्हापासून मी जे काही बघतो ते अगोदरपासून वाचलं ,तेव्हापासून 370 कलम सुरू आहे .नरेंद्र मोदी यांचे सरकार आलं आणि 370 कलम रद्द केलं. 370 कलम रद्द झालं हे नरेंद्र मोदी यांच्या सरकारमुळे झालं. हे तुम्हाला सर्वांना मान्यच करावा लागेल.
अयोध्येला देशभरातून कारसेवक गेले तेव्हा चॅनल नव्हती, फक्त दूरदर्शन होतं. जेव्हा कारसेवक गेले त्या कारसेवकावर मुलायम सिंग यादव यांच्या सरकारने गोळ्या घातल्या.हे माझ्या डोळ्यासमोरून आजही जात नाही. कोण कुठचा बाबर आणि बाबाराला सापडणाऱ्या आमच्याकडच्या अवलादी. 92 साली बाबरीचा ढाचा फोडला गेला आणि कोर्टाने राम मंदिर बांधण्याची परवानगी दिली. पहिल्या फेज मध्ये रामलल्लाला उभे राहिले. प्रतिष्ठापना झाली जसं काश्मीरचे झालं तसं राम मंदिरच झालं आहे.मी तुम्हाला निश्चित सांगतो हे नरेंद्र मोदींचे सरकार आणि सुप्रीम कोर्ट यांच्यामुळेच हे राम मंदिर उभे राहिले आहे.आणि कार सेवकांना शांतता मिळाली. ज्या गोष्टी योग्य आहेत, त्या योग्य आहेत, ज्या अयोग्य आहेत त्या अयोग्य आहेत. मित्रांची खरडपट्टी काढताना मागे पुढे पाहता कामा नये आणि दुश्मनाची स्तुती करताना मागेपुढे पाहता कामा नये. मग मी विचार केला ,देशाचं काय होणार आहे .एकतर मोदींच्या विरोधात किंवा पाठीशी असावा लागेल.2019 मध्ये मी बोललो. आजचे विरोधी पक्ष आहेत त्यांची हिंमत नाही मोदींबद्दल बोलायची,असा टोला राज ठाकरे यांनी विरोधकांना लगावला.
माझा उद्देश पारदर्शक होता ते आताच्या येथील सरकारमध्ये नाही. मला मुख्यमंत्री पद दिले नाही, मला मंत्रीपद दिले नाही म्हणून मी विरोधात ,मला ही भूमिका नाही पटली म्हणून मी विरोधात. विरोधासाठी विरोध करत नाही .काल उद्धव ठाकरे येऊन गेले . तुमचं अडीच वर्षाचं काय ते झेंगाट होतं .अडीच वर्ष तुम्हाला अडीच वर्ष मला, भारतीय जनता पार्टीने तुम्हाला मुख्यमंत्री पद दिल असत तर तुम्ही बोलला असता का ?असा सवाल उद्धव ठाकरे यांना केला. सत्तेचा बोळा तोंडात गेल्यासारखं गप्प बसणार होता जी गोष्ट हिरावून घेतली त्यामुळे तुम्ही बोलला. कोकणातील उद्योगधंदे गुजरातला जात होते, या उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर राज ठाकरे म्हणाले, वारेवा 2014 ते 2019 त्यांच्याबरोबर सत्तेत बसला होता. तेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होता. या दहा वर्षातील साडेसात वर्ष उद्धव ठाकरे सत्तेत होते. का नाही विरोध केला ?
उद्योग धंदा आला की यांचा खासदार विरोध करणार आणि आमदार पाठिंबा देणार अशी टीका केली.
आपण का विरोध करतो हे माहिती आहे का? माहित नाही जैतापूर अनु ऊर्जा प्रकल्प कोकणचा नाश करेल. तिथे स्पोट झाला तर काय होईल अशा शंका उपस्थित केले जात होत्या.
राज ठाकरे यांनी आपल्या स्टाईलने अणुऊर्जा प्रकल्प देशात कुठे कुठे आहेत याची यादीच वाचून दाखवली.अणुऊर्जा प्रकल्प भारतात आहे याची नावे वाचून दाखवली उद्या स्पोट झाला तर किती माणसं कोकणात मरतील याची चिंता त्यांना माहित नाही का ?भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर हे मुंबईत आहे हे त्यांना माहित नाही का ? न्यूक्लिअर ट्रॅक्टर मुंबईत आहे , स्पोट झाला तर न्यूक्लिअर रिऍक्टरचा होतो हे त्यांना माहित नाही का? त्यांना आठवत नाही का? बाबा ऑटोमॅटिक सेंटर मुंबईतून दूर लोटा काढून टाका असं का बोलत नाही. पण कोकणात येऊ द्यायचं नाही. नानारला विरोध करणार आणि शेतकऱ्यांना भडकवणार अशी अवस्था आहे. बारसू प्रकल्पाचे नवीन नाव ठेवायच असेल तर बारसू करावा लागतं. आता म्हणे बारसुला हलवा, पाच हजार एकर जमीन सापडली कशी बाबांनो हे मी तुम्हाला जे सांगतोय ना हे वरवर घेऊ नका, हे फक्त जमिनीचे प्रकार आहेत .त्यांच्यात लोकांनी जमिनी घेतल्या आहेत .तुमच्या कडून दहा रुपयांना घ्यायची आणि सरकारकडून दोनशे रुपयांनी घ्यायचे. हे खासदार विनायक राऊत यांचे हे सर्व प्रकार आहेत. याला बळी पडायचं आहे का? कोकण रेल्वे झाली, कोकणात चांगले उद्योग यावे प्रदूषण मुक्त प्रकल्प यावे ही प्रत्येकाची इच्छा आहे. बाजूचा गोवा बघा जग तिकडे जाते. गोव्यासारखं बीचवरील चित्र कोकणात दिसलं तर? आमची संस्कृती बिघडते, आमची संस्कृती खराब होते, दोन वेळेचं अन्न देऊ शकत नाही अशी कोणती संस्कृती असा सवालही राज ठाकरे यांनी केला. इकडची संस्कृती खराब इकडची संस्कृती खोटी तर गोवा आणि केरळ वाईट आहे का? असा सवाल केला.