तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या: 7 मे रोजी …
सावंतवाडी दि.५ मे
तिसऱ्या टप्पात होणाऱ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूकी साठी नऊ उमेदवार निवडणूक रिंगणात असून जाहीर प्रचाराची मुदत रविवारी सायं. 6 वा. संपली. मंगळवारी 7 मे रोजी सकाळी 7 ते सायं 6 या वेळेत मतदानासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. सिंधुदुर्ग तीन विधानसभा मतदार संघात 918 बुथ वर 6 64 566 मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. मतदान केंद्रा ठिकाणी चोख पोलीस बदोबस्त असून . मतदान यंत्रासह, मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, व इतर अधिकारी मिळून 4628 अधिकारी कर्मचारी मतदान केंद्रावर रवाना झाले आहेत. मतदारांनी निर्भय वातावरणात मतदान करावे असे आव्हान जिल्हाधिकारी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी किशोर तावडे यांनी केले आहे.
जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत राहावी म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्हाभर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जिल्ह्यात १७१ पोलीस अधिकारी २०४२ पोलीस अंमलदार व ८८१ होमगार्ड या निवडणूक बंदोबस्तात आहेत. त्याशिवाय सीएपीएफ ची एक कंपनी, सीआरपीएफ च्या तीन कंपन्या व एक जलद प्रतिसाद दलाची कंपनी ही या बंदोबस्तात देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील 918 मतदान केंद्रावर मतदानासाठी प्रतीक्षालय गर्दी झाल्यास टोकन सिस्टीम, मतदारांच्या वाहनासाठी पार्किंग व्यवस्था करण्यात आले आहे. कडक उन्हाळा लक्षात घेऊन मतदान केंद्रा ठिकाणी शुद्ध पिण्याचे पाणी प्रथमोपचार व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे.
जिल्ह्यात तीन लाख 31 हजार 580 पुरुष मतदार तीन लाख 32 हजार 977 महिला मतदान व एक तृतीयपंथी मतदार मिळून 664566 मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. यामध्ये दिव्यांग असलेले 7905 मतदार आहेत सर्विस मतदार 755 आहेत.
या मतदारसंघात नऊ उमेदवार निवडणूक रिंगणात असून केंद्रीय उद्योग मंत्री भाजप नेते नारायण राणे, यांच्यासह बहुजन समाजवादी पार्टीचे राजेंद्र आयरे, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे विनायक राऊत, बहुजन मुक्ती पार्टीचे अशोक पवार, वंचित बहुजन आघाडीचे मारुती जोशी, सैनिक समाज पार्टीचे सुरेश शिंदे, व तीन अपक्ष उमेदवार म्हणून अमृत तांबडे, विनायक लवू राऊत, शकील अब्दुल करीम सावंत असे नऊ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सर्वच पक्षांची प्रचाराची रणधुमाळी रविवारी सायंकाळी संपली.