सावंतवाडी दि.६ मे
गेल्या सात दिवसांत जिल्ह्यातील आठही तालुक्यातील गावांत फिरताना जनतेमध्ये दोनच मुद्द्यांवर खरी चर्चा आहे. त्यात महागाई आणि बेरोजगारी प्रचंड वाढ झाली मात्र त्यावर कोणतीही उपाययोजना केल्या नाहीत असे डॉ जयेंद्र परुळेकर यांनी सांगितले.
डॉ जयेंद्र परुळेकर म्हणाले,सामान्य जनता महागाईने त्रस्त आहे.त्यांना त्यांच्या तुटपुंज्या उत्पन्नावर घर चालवणे मुश्कील झालेले आहे. घरात शिकलेल्या मुलाला नोकरी नाहीये आणि त्यामुळे वाद होत आहेत. गोव्यात नोकरी शोधून देखील मिळत नाहीये.अनेकांची परिस्थिती गंभीर आहे.एकच सूर सर्वत्र ऐकू येत आहे “राणे साहेब आपसे बैर नहीं पर मोदीजी आपकी इसबार खैर नहीं “काहीही झालं तरी कमळ नको हाच सुप्त आवाज आहे असे डॉ जयेंद्र परुळेकर यांनी म्हटले आहे.