नारायण राणे मुख्यमंत्री असताना सन्मानाची वागणूक देत असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात उद्धव ठाकरे माझ्यासह आमदारांना वर्षा बंगल्याच्या बाहेर तिष्ठत ठेवायचे…

सावंतवाडी,दि.६ मे
मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात उद्धव ठाकरे माझ्यासह आमदारांना वर्षा बंगल्याच्या बाहेर तिष्ठत ठेवायचे .मात्र मला नारायण राणे मुख्यमंत्री असताना सन्मानाची वागणूक देत असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटले आहे. आमदार वैभव नाईक आम्ही स्वाभिमानाने जगतो. एकही पैसा निवडणुकीत वाटला नाही किंवा मी कुणाकडूनही घेतला नाही. त्यामुळे तोंड सांभाळून बोला असा इशारा केसरकर यांनी दिला. खोके वाटले म्हणतात, तर आम नाईक तुम्ही साई दरबारात या खरं खोटं पाहू .

आमदार वैभव नाईक यांनी आज मंत्री केसरकर यांच्यावर पत्रकार परिषद घेऊन विधान केले. त्याबाबत केसरकर म्हणाले, आमदार वैभव नाईक यांनी आक्षेपार्य विधान केले आहे ए बी सी असे गट ठरवून पैसे वाटप केले. आमदारांना ५० खोके दिले असे त्यांनी म्हटले आहे. हे निकालास खोटे आहे. कोकणी माणूस किंवा आमदार लाचारी पत्करणार नाही मी साईबाबांचा भक्त आहे साई दरबारात या आपण याबाबत शपथ घेऊ असे आवाहन केसरकर यांनी दिले.
कोकणी माणूस लाचार नाही वैभव नाईक तुम्हाला आमदार म्हणून निवडून आणण्यास मी मदत केली. माझ्यामुळे तुम्ही आमदार झाला. हे विसरू नका. तुमच्या वैयक्तिक अडचणीमुळे तुम्ही आमच्याबरोबर आला नाही, समजू शकतो. मी आजही ठाकरे कुटुंबियाच्या आदरापोटी उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांच्यावर सौजन्याने बोलतो. पण कोकणी माणसाच्या स्वाभिमानाला कोणी ठेच पोहोचवली तर कोकणी माणूस गप्प राहणार नाही.आम.नाईक तुम्ही निकलास खोटे बोलत आहात. वैभव नाईक तुम्ही निवडणुकीत मतदारांना पैसे वाटप करत असाल. पण मी निवडणुकीत एकही पैसा वाटप करत नाही. मी खरा आहे. त्यामुळे एकही रुपया घेतला नाही किंवा एकही रुपया वाटला नाही असे केसरकर यांनी सांगितले.
बाळासाहेबांच्या विचारापोटीत आम्ही बाहेर पडलो. जनतेचा लोकप्रतिनिधी असतो त्याला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्याच्या काळात वाईट वागणूक दिली.नाईक तुम्ही लाचारी सहन करा पण मी लाचारी सहन करणार नाही.आम्ही स्वाभिमानाची लढाई लढत आहोत आणि ती जिंकूही. मतांसाठी कोण पैसे वाटत असेल तर तक्रार केली पाहिजे. आम्हालाही लोक सांगतात उबाठा वाले पैसे वाटतात. पण आम्ही त्याबाबत बोललो नाही असेही केसरकर यांनी ऑनलाइन पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.