लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील अकरा मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ४२.६३ टक्के मतदान

मुंबई, दि.७ मे

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.७ में २०२४ रोजी सकाळी ७.०० वा. पासून सुरु झाले आहे. तिसऱ्या टप्प्यातील एकूण अकरा मतदार संघात दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ४२.६३ टक्के मतदान झाले आहे.

तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे
लातूर – ४४.४८ टक्के
सांगली – ४१.३० टक्के
बारामती – ३४.९६ टक्के
हातकणंगले – ४९.९४ टक्के
कोल्हापूर – ५१.५१ टक्के
माढा – ३९.११ टक्के
उस्मानाबाद – ४०.९२ टक्के
रायगड – ४१.४३ टक्के
रत्नागिरी -सिंधुदूर्ग- ४४.७३ टक्के
सातारा – ४३.८३ टक्के
सोलापूर – ३९.५४ टक्के