सावंतवाडी दि.७ मे
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाढत्या उष्णतेचा त्रास होऊन मतदानाचा टक्का घसरेल असा अनुमान काढणाऱ्या जाणकारांना आज मतदारांनी चकवा दिला. भर दुपारी उन्हात चटके खात मतदान केंद्रावर मतदारांनी गर्दी केली होती. सायंकाळी ३ वाजेपर्यंत १ लाख ९ हजार ६७० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला त्याची सरासरी ४८.८६ होते.तर संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ही सरासरी ६०. ३ टक्के झाली होती.
आज सकाळपासूनच मतदान चांगल्या पद्धतीने सुरू होते. मात्र ग्रामीण भागात नऊ वाजेपर्यंतच्या टक्केवारी कमी असली तरी त्यानंतर मात्र भर उन्हात चटके खात मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असल्याने मतदानाची सरासरी वाढली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ला तालुक्यात मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दाखविला सकाळी सात वाजल्यापासून एक वाजेपर्यंत ८६ हजार १०७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तो सरासरी ३८.८६ टक्के होतो तर सकाळी सात वाजल्यापासून तीन वाजेपर्यंत एक लाख ९ हजार ६७० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला त्याची सरासरी ४८.८६ टक्के होते. तर सायंकाळी पाच वाजेपर्यंत ६०.३ टक्के सरासरी झाली होती.
सकाळी नऊ वाजल्यानंतर मतदानाची सरासरी वाढत गेली.भर दुपारी उन्ह असूनही मतदारांनी ठिकठिकाणी उपस्थिती दर्शवली होती. यामध्ये महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता संध्याकाळी पाच ते सहा या एका तासाच्या काळामध्ये ज्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला नाही त्या मतदारांना कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रापर्यंत पोहोचविण्याचा किंवा घरातून बाहेर मतदानासाठी काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मतदारांनाची सरासरी वाढली.
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि माजी नगराध्यक्ष सौ पल्लवी केसरकर यांनी चितारआळी , माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी भडवाडी, माजी नगराध्यक्ष अँड दिलीप नार्वेकर यांनी बाजारपेठेत, माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी सबनिसवाडा तर माजी आमदार राजन तेली यांनी कणकवलीत मतदानाचा हक्क बजावला. माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी तिरोडा तर माजी आमदार शंकर कांबळी यांनी शिरोडा येथे मतदानाचा हक्क बजावला.
सकाळपासून मतदान सुरू झाले तेव्हा मंत्री दीपक केसरकर ,माजी आमदार राजन तेली, माजी नगराध्यक्ष संजू परब ,माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी नगराध्यक्ष अँड दिलीप नर्वेकर, ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ ,संपर्कप्रमुख शैलेश परब ,राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्चना घारे ,भाजपचे सरचिटणीस महेश सारंग,भाजपचे माजी तालुकाध्यक्ष संदीप गावडे आणि मान्यवरांनी बुथवर भेटी देऊन कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्याचे देण्याचा प्रयत्न केला.
शहर आणि ग्रामीण भागामध्ये भाजप महायुतीचे कार्यकर्ते अर्थात भाजप, शिवसेना शिंदे, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि रामदास आठवले आरपीआय गटाचे कार्यकर्ते तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना महायुतीचे महाआघाडीचे ठाकरे शिवसेना ,काँग्रेस ,शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस व चंद्रकांत हांडोरे भीमशक्ती अशा महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार मतदान करण्यासाठी पुढाकार घेतला होता.
चौकट
सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ला तालुका या विधानसभा मतदारसंघात सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ६१.०७ टक्के मतदान झाले ते एक लाख ३७ हजार ०८० एवढे होते, हे उस्फूर्त मतदान झाल्याचे मानले जात आहे. भर उन्हात चटके खात मतदारांनी मतदान केले ते कोणाला लाभदायक ठरते याकडे साऱ्यांचे लक्ष वेधले आहे. नारायण राणे आणि विनायक राऊत यांच्या समर्थकांनी आपलाच उमेदवार विजयी होईल असे छातीठोकपणे सांगू लागले आहेत.