असलदे गावात लोकसभेसाठी ७०.४१ टक्के मतदान

९७७ पैकी ६८८ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क; शांततेत मतदान प्रक्रिया पडली पार..

कणकवली दि.७ मे(भगवान लोके)

कणकवली तालुक्यातील असलदे गावात एकूण ९७७ पैकी ६८८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.त्यामुळे सरासरी मतदान ७०.४० टक्के मतदान झाले .असलदे गावात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.

असलदे पूर्ण प्राथमिक शाळा न.१ येथे येथील मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली.त्यामध्ये
पुरुष मतदार ४९९ पैकी ३५३ मतदान झाले,स्त्री मतदार ४७८ पैकी ३३५ मतदारांनी मतदान केल्याने एकूण ६८८ मतदान झाले.मतदान प्रक्रिया सुरु असताना चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाची गस्त सुरु होती.

महायुती उमेदवार केंद्रीयमंत्री नारायण राणे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या कार्यकर्त्यांनी मतदान केंद्राच्या दोन बाजूला आपले बूथ लावले होते.सकाळपासूनच कार्यकर्त्यांनी आप आपल्या मतदारांना बाहेर काढण्यासाठी मेहनत घेतली.आता ४ जून रोजी लागणाऱ्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.