सावंतवाडी दि.९ मे
आचारसंहिता आणि दुरुस्तीच्या नावाखाली जिल्ह्यातील बहुतेक विश्रामगृह बंद ठेवण्यात आली आहेत.थंड हवेचे ठिकाण असलेल्या आंबोली आणि समुद्र किनाऱ्यावर असलेल्या वेंगुर्ला येथील सागर बंगला दरवर्षी दुरूस्ती किंवा पाणी नसल्याने बंद ठेवण्यात येत आहे.
आचारसंहिता आणि दुरुस्तीच्या नावाखाली जिल्ह्यातील बहुतेक विश्रामगृह बंद ठेवण्यात आली आहेत. मतदान झाले असले तरी आचारसंहिता शिथिल झाली नसल्याने वापरायोग्य असलेली विश्रामगृह जिल्हाधिकारी यांच्या ताब्यात आहेत. त्यामुळे विश्रामगृहात राहु इच्छिणाऱ्यांसाठी सध्या शासकीय विश्रामगृहाचे दरवाजे बंद ठेवण्यात आले आहेत.
आंबोली आणि समुद्र किनाऱ्यावर असलेल्या वेंगुर्ला येथील सागर बंगला चे दुरुस्तीच्या नावाखाली दरवर्षी आर्थिक खर्च घातला जातो. तो एक संशोधनाचा विषय ठरेल. दरवर्षी दुरूस्ती किंवा पाणी नसल्याने बंद ठेवण्यात येणाऱ्या या विश्रामगृहाच्या कामांची चौकशी केली पाहिजे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. त्यामुळे गेल्या दहा ते पंधरा वर्षांत आंबोली व सागर बंगला वर दुरूस्तीच्या नावाखाली किती खर्च झाला त्याची सखोल चौकशी करून सत्य परिस्थिती आम जनतेसमोर ठेवतील का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. रवींद्र चव्हाण प्रशासनाला जाग आणुन देणारे म्हणून ओळखले जातात त्यामुळे त्यांच्याकडे मंत्रीपद असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील विश्रामगृह विषय असल्याने त्यांना चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.