सावंतवाडी दि.१३ डिसेंबर
वनविभाग आणि जलद कृती दल (रॅपिड रेस्क्यू टीम) यांनी माडखोल येथे माकड पकड मोहीम राबवली या मोहिमेत तब्बल ६८ माकड जेरबंद करण्यात आले. स्थानिकांचे मते सद्यस्थिती माकडांचे वाढते प्रमाण शेतकऱ्यांचे डोकेदुखी वाढवत आहेत ते नारळ, केळी आदी पिकांचे नुकसान करतात त्यामुळे शेतकरी वर्ग पुरता हैराण झाला आहे.
माडखोल डुंगेवाडी परिसरात तर माकड घरात शिरून घरातील फळभाज्या फस्त करत आहेत. या पार्श्वभूमीवर तेथे माकड पकड मोहीम राबवण्यात आली त्यामुळे या भागातील रहिवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
आर आर टी वन विभाग सावंतवाडी यांनी ही मोहीम राबवली. याचा मूळ उद्देश जंगली प्राण्यांपासून माणसांना त्रास होऊ नये आणि माणसांपासून प्राण्यांचे संरक्षण व्हावे हा आहे या उद्देशाने ही टीम काम करत असून पकडलेले वन्यजीव प्राणी नैसर्गिक अधिवासात सोडले जातात या मोहिमेबद्दल ग्रामस्थांकडून आभार मानण्यात आले.
सध्या वाढलेले माकडांचे प्रमाण पहाता या माकडांचा बंदोबस्त करून शेतकरी व बागायतदारांची नुकसानी टाळण्यासाठी वन विभागाने पुढाकार घ्यावा अशी मागणी करण्यात येत आहे.