विद्यार्थ्याची प्रकृती सुधारत असून त्यातील बहुतांश विद्यार्थ्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले

सावंतवाडी, दि.१० मार्च
सावंतवाडी तालुक्यातील सांगेली येथील जवाहर नवोदय विद्यालयात शिकणाऱ्या तब्बल तब्बल १५५ विद्यार्थ्यांना गुरूवारी रात्री अन्नातून विषबाधा झाली होती.त्या सर्व विद्यार्थ्याची प्रकृती सुधारत असून त्यातील बहुतांश विद्यार्थ्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहे.सध्या सर्वाची प्रकृती स्थिर आहे.
दरम्यान रुग्णालयातून घरी सोडण्यात आलेल्या एका विद्यार्थीनी ला पुन्हा त्रास होऊ लागल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
सावंतवाडी तालुक्यातील सांगेली येथील नवोदय विद्यालयातील १५५ विद्यार्थ्यांना गुरूवारी रात्रीच्या जेवणानंतर शुक्रवार पहाटेपासून पोटदुखी झुलाब उलटी सुरू झाली त्यानंतर लागलीच स्थानिका च्या मदतीने विद्यार्थ्यांना सांगेली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. दरम्यान आमदार नितेश राणे यांनी शनिवारी रात्री उशिरा रुग्णालयाला भेट देऊन विद्यार्थ्यांची विचारपूस केली
मात्र शुक्रवारी सकाळी दहा वाजल्यापासून विद्यार्थ्यांची संख्या आणखी वाढली तो आकडा शंभर च्या बाहेर जात गेला.
विद्यार्थ्यांच्या वाढत्या संख्येनंतर सांगेली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील जागा अपुरी पडू लागली तसेच मनुष्यबळ कमी सुविधा अपुऱ्या असल्याने विद्यार्थ्यांची प्रकृती ही थोडी गंभीर वाटत असल्याने त्यांना लागलीच सावंतवाडीतील कुटीर रुग्णालयात हलविण्यात आले होते.पण आता बहुतांश विद्यार्थ्याची प्रकृती सुधारत असून त्यांना घरी सोडण्यात येत आहे
दरम्यान कुटीर रुग्णालयातून विद्यालयात पाठविण्यात आलेल्या दहावी तील मुलीला रविवारी दुपारनंतर पुन्हा त्रास होऊ लागला त्यामुळे या मुलीला येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले थोडीशी उन्हातून गेल्याने हा प्रकार घडला असा अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला असून तिच्यावर उपचार सुरू आहेत सध्या तिची प्रकृती स्थिर आहे.